Tuesday, 17 February 2015

दिव्य प्रकाशरुपी कंदील अर्थातच क्रांतीची मशाल : नितीनराजे अनुसे

ब्लॉग दि. १७ फेब्रुवारी २०१५

        चिकीत्सकपणे अभ्यास केल्यास असे दिसून येईलकी 21 व्या शतकात सुद्धा धनगर
समाजाची अवस्था अजूनही अत्यंत दयनीय
स्वरूपाची आहे.
विज्ञानामूळे माणसाच्या जिवनामध्ये अनेक बदल
घडत गेले, माणसाने समूद्राची खोली
गाठली, पृथ्वीच्या पोटातील विवीध
रसायनांचा शोध लावला,
आकाशावरती साम्राज्य
मिळवले आज माणूस चंद्रावर आणि मंगळावर
सुद्धा पोहचला पण माझा धनगर समाज अजूनही
अंधारतच गुरफटलेला आहे. अंधश्रद्धेवरती विश्वास
ठेवणार्या या माझ्या समाजाला
तेजस्वी प्रकाशाची गरज आहे.
'खरंतर झोपलेल्यांना जागे करता येते पण झोपेचं
सोंग(नाटक) करणार्यांना जागे
करता येत नाही' अशी एक म्हण आहे.
पण माझ्या मतानूसार 'सोंग
करणार्यांना सुद्धा लाथ घालून जागे करता येते'.
धनगर समाज अजूनही निद्रावस्थेत आहे.
अज्ञानाचं घोंगडे पांघरूण हा आजचा तरून
सुद्धा गाढ झोपी गेलेला आहे. मग
या समाजाला जर यशाच्या शिखरापर्यंत
पोहचायचं
असेल तर काही गोष्टींचा अवलंब केल्यास समाज
निश्चित स्थळी पोहचू शकतो हे माञ
नक्की....
त्यासाठी समाजातील तरून
पिढीला निद्रावस्थेतून जागे करा,
जे जागे आहेत/होतील त्यांना उठवून उभा करा,
समाजाच्या हक्कासाठी आणि समाजावरती
होणार्या अन्यायाच्या विरोधात लढण्यास
समर्थ करा, त्या तरूनांना बोलतं करा आणि
चालतंही करा करा,
पण पाऊल पुढे टाकण्याच्या अगोदर प्रत्येक
तरूनाच्या हातात एक ज्ञानरूपी कंदील
द्या जेणेकरून त्या तेजस्वी प्रकाशामध्ये
तो स्वतःचा मार्ग शोधून समाजाला
योग्य दिशा दाखवून देइल.
ज्ञानशक्तीच्या जोरावर पारंपारिक
आणि रूळलेल्या मार्गाचा अवलंब न करता नविन
मार्ग स्विकारेल
आणि स्वतःच्या पाऊलखूणा पाठीमागे राहतील
अशा प्रकारे
समाजामध्ये स्वतःची एक नविन ओळख निर्माण
करेल असच त्या तरूनांना प्रेरित करा.
या जिवणाच्या वाटेवर काही अडथळे येतील,
काही समस्या उद्भवतील पण धीर न खचता
यावरती मात करूनच पूढे जायला लागेल कधी-
कधी त्या वाटेवर चालताना तरूनांना
दगड-धोंडे आडवे येतील काटेकूटे आडवे येतील, ऊन
वारा पाऊस या सर्वांवर मात करून
पूढे जायला शिकवा.
'जर यशाच्या शिखरापर्यंत पोहचायच असेल तर
अपयशाच्या टेकड्या पार कराव्याच
लागतात'.
या प्रवासात जेव्हा डोंगर-टेकड्या आडव्या येतील
तेव्हा जे अशक्त आहेत जे डोंगर
चढू शकत नाहीत त्यांना स्वतःच्या पाठीवर
घ्या आणि डोंगर पार करा, जिथे
समूद्र-नद्या आडव्या येतील
तेव्हा ज्यांना पोहता येत नसेल त्यांनी
पोहणारांच्या पाठीवर बसा आणि समूद्र पार
करा.
अशा प्रकारे जर धनगर समाजाने एकमेकांची सुख-
दूःखे वाटून घेतली तर या जिवनाच्या
शर्यतीत फक्त आपण आणि आपणच
जगाच्या सर्वात पूढे राहू.....!
त्यावेळी आपल्या पूर्वजांना एक
प्रकारचा विलक्षण आनंद होईल आणि सर्वजन
बोलतील....
"शाब्बास रे माझ्या वाघांनो !!!
'धनगर' असल्याची तुम्ही खरी लाज राखली"
"काश्मिरपासून कन्याकुमारी पर्यंत
आणि
गुजरात पासून आसामपर्यंत
हिमालयाच्या पर्वत रांगेतून,
सह्याद्रीच्या दरी-खोर्यातून..
एकच नाद घूमूदे,
धनगर सारा एक होऊदे".
    ✍️नितीनराजे अनुसे
 अनुसेवाडी ता.आटपाडी जि.सांगली
   +918530004123

No comments:

Post a Comment