Saturday, 2 May 2015

महा'राष्ट्र'....

आज १ मे महाराष्ट्र व कामगार दिन..,
गावोगावी तसेच शहरात आणि प्रत्येक विभागात फ्लैक्स वरतून शुभेच्छांचा वर्षाव होताना दिसला तसेच आज दिवसभर एकमेकांना महाराष्ट्र दिनाच्याच फोनवरतून तसेच सोशल मिडीयावरतून शुभेच्छा देण्यात आल्या पण कामगार दिनाच्या शुभेच्छा मात्र  क्वचितच लोकांनी दिल्या.
महाराष्ट्र व कामगार दिनानिमीत्त एकमेकांना शुभेच्छा  द्याव्यात त्याबद्दल माझं काही दुमत नाही पण याव्यतिरीक्त इतर काही गोष्टींचा अभ्यास करुन त्यावरती विचारविनीमय करणे मला तितकच योग्य वाटते. आज प्रामुख्यानं महाराष्ट्र दिन पण "महाराष्ट्र" हा शब्द नक्की आला कोठून त्याचा थोडक्यात आढावा घेवूया...
खरंतर महाराष्ट्र या शब्दाची सुरवात मरहट्टी या शब्दापासून होते. कर्नाटक मधील मरहट्टी लोक (म्हणजेच शेळ्या-मेंढ्या पाळणारे पशुपालक) त्यांना हट्टीजन म्हणून ओळखले जाते. कन्नड मधील हे हट्टीजन लोक म्हणजेच शेळ्या मेंढ्या पाळणारा धनगर समाज आहे आणि हे मरहट्टी जी भाषा बोलायचे त्यांस "मरहट्टी" भाषा व कालांतराने त्याचा अपभ्रंश होऊन मरहट्टी चा "मराठी" हा प्रचलित शब्द तयार झाला. हट्टीजनांचे म्हणजेच धनगरांचे राष्ट्र (मरहट्ट्यांचे राष्ट्र = महाराष्ट्र) उदयास आले. पूर्वीच्या सातवाहन या धनगर जमातीचा या राष्ट्राच्या जडण-घडणीत सिंहाचा वाटा असल्याने हे धनगरांचे राज्य निर्माण झाले व मरहट्ट्यांची मरहट्टी भाषा तसेच मरहट्ट्यांचे राष्ट्र (धनगरांचे राष्ट्र) निर्माण झाले.
महाराष्ट्र राज्य स्वतंत्र व्हावे आणि मुंबई हा प्रांत महाराष्ट्र राज्यात यावा म्हणून ज्या १०५ हुतात्म्यांनी बलिदान दिलं गेलं त्या शहिदांना विनम्र अभिवादन करतो पण स्वतंत्र महाराष्ट्र स्थापण करुन माझ्या मरहट्टी (मराठी) बांधवांना महाराष्ट्राच्या छाताडातून वेगळं केलं गेलं याचंच दु:ख मनोमन होतंय. सदरच्या मध्यप्रदेश राज्यातील इंदौर हे संस्थान जिथं माझे मरहट्टी बांधव वास्तव्य करत असताना स्वतंत्र महाराष्ट्र राज्याच्या निर्मीतीनंतर त्यांना मध्यप्रदेशात रहावं लागतंय आज तिथे मराठी भाषा वापरणारे वास्तव्य करताहेत त्याशिवाय कर्नाटकमधील माझ्या बांधवांनादेखिल महाराष्ट्रापासून अलिप्त ठेवण्यात आलं मग आज महाराष्ट्र दिनानिमीत्त मी आनंद साजरा करू की दु:ख व्यक्त करु या संभ्रमात रहावं लागतंय. म्हणून शुभेच्छा द्यायच्या की नाहीत हे कोडं पडलं आहे.
मी मराठी असा डंका पिटणार्या आणि मराठीचा (मरहट्टीचा) उदो 'उदो' करून 'राज'कारण करणार्या त्या परप्रांतीयांना  माझ्या मरहट्टीची(धनगर समाजाची) ताकद काय कळणार?? मी मराठी मी मराठी असं तोंड वरती वरून सांगताहेत पण माझ्या मराठी (मरहट्टी=धनगर) बांधवांना आरक्षण द्यायची वेळ येते त्यावेळी त्यांच्या म्हणजेच मी मराठी (मी मरहट्टी=मी धनगर) बोलणार्यांच्या तोंडातून ब्र देखिल निघत नाही तसेच या मरहट्टी समाजाला आरक्षण मिळू अशी भाषा करणारे ते भट आणि त्या प्रस्थापित जाती आहेत मग जनतेला तुम्ही किती दुधखुळं बनवता याचा अंदाज तुम्हाला येत नाही. माझ्याच मरहट्टी च्या नावावर राजकारण करू इच्छिनार्यांना २०१४ च्या निवडणूकांमध्ये पराभवाची धूळ खावी लागली ती मराठी (मरहट्टी =धनगर) समाजामुळेच...
महाराष्ट्र राज्यातील परिणामी भारतातील क्रमांक एक वरती असलेल्या धनगर समाजाला अजून स्वतःची ताकद काय आहे याचा अंदाज आलेला नाही. फक्त महाराष्ट्र राज्यात एकूण ५२ पोटजातींमध्ये धनगर समाजाची विभागणी झाल्याने खरी धनगर समाजाची लोकसंख्या किती आहे याचे अनुमान काढणं तोपर्यंत शक्य नाही जोपर्यंत अनेक पोटजातींमध्ये विभागलेला मरहट्टी म्हणजेच धनगर समाज एकत्रित येत नाही. पण या राज्यकर्त्यांनी  मी मराठी मराठी करून काय दिवे लावले होते हे तर सर्वांना ज्ञात आहे. उलट माझ्या मरहट्टी समाजावरती घोर अन्याय केला आहे. स्वतंत्र महाराष्ट्रासाठी लढलेले १०५ हुतात्मे हे मरहट्टीच होते पण त्यांच्या कुटूंबीयाकडे देखिल दुर्लक्ष झाल्याचं चित्र दिसून येते पण राज्यकर्त्यांना डिंडोरा पिटण्याशिवाय दुसरे तिसरे उद्योग नाहीयेत स्वताचे नाव झालं म्हणजे बस् बाकीचे कसे का असेनात अशी त्यांची वृत्ती दिसून येते संबंध महाराष्ट्राच्या राजकारणात मरहट्टी (मराठी) असलेल्या धनगर समाजाची लोकसंख्या अव्वल स्थानावर असून देखिल प्रस्थापित भट जातींनी मरहट्टी लोकांना वरती येवू दिले नाही म्हणजेच हापापाचा माल गपापाला असंच म्हणायची वेळ आली आहे.

         -नितीनराजे अनुसे
अनुसेवाडी ता आटपाडी जि सांगली
         +९१७६६६९९४१२३
  nitsanuse.blogspot.com
nitinrajeanuse.blogspot.com

Thursday, 30 April 2015

समानता आणि हक्क...तसेच विषय आरक्षणाचा...

समानता असायला हवी असं प्रत्येकजण म्हणतो अगदी मी सुद्धा.. पण आज भारत देशात  ते खरंच संभाव्य आहे का ??? याची पडताळणी करायला हवी. धनगर समाजासाठी ST आरक्षण कीती फायदेशीर आहे?? आणि कीती नुकसानदायक आहे?? यावरती एका धनगर बांधवांसोबत चर्चा करताना "समानता" यावर देखिल चर्चा करण्यात आली. भारत माझा देश आहे सारे भारतीय माझे बांधव आहेत आणि आम्ही सर्व एक आहोत असे अभिमानाने सांगता तर मग दलित बांधव असोत अथवा इतर मागास वर्गीय  (भट जाती आणि प्रस्थापित घराणेशाही सोडून इतर) समाजावरती अन्याय का होतोय ते मला कळेल का??
महाराष्ट्रपुत्र डॉ भाऊसाहेब उबाळे [मुळ गाव वडगाव (जयराम स्वामी) ता कराड जि सातारा त्यांचा जन्म १९३६ साली बावची येथे झाला],कनाडा देशाचे ते मानवी हक्क अधिकार साठी कार्यरत असणारे व कनाडा देशाचा "Order of Ontario" हा सन्मान मिळवणारे एक जिगरबाज समाजसेवक म्हणून त्यांची ओळख आहे. ("Order of Ontario":-Awarded for Demonstrations of excellence
in any field or outstanding
contributions to society in
Ontario and elsewhere)
1975 मध्ये लंडन मधील University of Bradford मधून त्यांनी Phd  मिळवली होती. पण तिथे गोरा आणि काळा असा वर्णभेद असल्यामुळे लंडन मध्ये त्यांना नोकरीसाठी संघर्ष करावा लागत असे म्हणून डॉ भाऊसाहेब ऊबाळे यांनी कनाडा मध्ये मानवी हक्क अधिकाराचे कमिशनर असताना तिथे सर्व देश-विदेशातील नागरिकांसाठी समानतेचे हक्क आणि कायदे तयार केले. कनाडा मध्ये समानता(Equality) असायला हवी होती आणि म्हणून कनाडा सरकार ने त्यांना "Order of Ontario" या पुरस्काराने सन्मानित केले.
तद्नंतर भाऊसाहेब उबाळे भारतामध्ये आले असता त्यांनी स्थानीक नेत्यांसोबत समानतेबद्दल(Equality) चर्चा केली पण भारतातील प्रामुख्याने महाराष्ट्रातील  शिक्षण सम्राट तसेच साखर सम्राट असलेल्या प्रस्थापित घराणेशाहीतील नेत्यांनी (जे तुमचे आमचे राजकीय आणि सामाजिक शत्रु आहेत त्यांनी) त्यांचे हसू उडवले. प्रस्थापितांच्या असल्या धोरणामुळे एक सच्चा देशभक्त आणि समाजसेवकाला पुन्हा कनाडा मध्येच आयुष्य समर्पित करावं लागलं.

भारतामध्ये जर समानता(Equality) हे धोरण राबवायचे असेल तर काही असंभव गोष्टी निर्णायक ठरतील... मग आरक्षण हा देखिल मुद्दा वादाचा ठरू शकतो.
आज धनगर समाज ६७ वर्ष झाली ST च्या सवलतीपासून वंचित आहे आणि त्यांना यापासून वंचित ठेवायचं काम भटांनी व प्रस्थापित पवार पाटील देशमुख ठाकरे यांनी केलं आहे आणि आजही करत आहेत. मग हा समाज आदिवाशी तसेच इतरांसारखाच अजूनही मागासलेला आहे मला सुद्धा समानता असावी असं वाटणं साहजिक आहे, पण जर समानता राबवायची असेल तर
१)कोणत्याही जाती धर्मास कोणत्याही क्षेत्रात जे आरक्षण आहे ते आरक्षण माघारी घ्यावे लागेल.
२) शिक्षण बाबतीत सर्व जाती धर्मांना परवडणारे शैक्षणिक शुल्क समान करावे लागतील.
३) राजकारण(politics) मध्ये सर्वांना समान संधी द्यावी लागेल.
४) सर्व शिक्षण संस्था तसेच साखर कारखाने व उद्योगधंदे भारत सरकारच्या अखत्यारित आणावे लागतील.
५) स्वजातीय तसेच पाहुण्या रावळ्यांचे बस्तान बंद करायचे असेल तर खाजगी प्रकल्प तसेच उद्योगधंदे भारत सरकारच्या स्वाधीन करावे लागतील मग त्यावरती कोणाचीही मालकी राहणार नाही.
पण याची दुसरी बाजू सुद्धा लक्षात घेणं गरजेचं आहे कारण कोणत्याही नाण्याला दोन बाजू असतात...
जर समानता राबवली तर...
१)शैक्षणिक शुल्क जरी सर्वांना परवडणारे आणि समान असले तरी शिक्षण सम्राटांचे नातेवाईक या संधीचा जास्तीत जास्त लाभ घेतील मग इतर समाजाचं काय???
२) सर्व शिक्षण संस्था आज प्रस्थापित नेत्यांच्या आहेत तिथं गोरगरीब तसेच दलित बांधव असोत अथवा चांभार, कुंभार, ढोर, न्हावी, साळी, तेली, कोष्ठी, वंजारी, हटकर, धनगर, सनगर, रामोशी, वडर, बेडर, मुसलमान, लिंगायत, कोळी, परीट, लोणारी इ. या अठरा पगड जातींना शिक्षणापासून पुन्हा वंचित राहावं लागेल.
३) उद्योगधंदे तसेच साखर कारखाने हे देखिल प्रस्थापित घराणेशाहीकडे असल्याने त्यांचे निकटवर्तीय याचा लाभ घेतील मग बाकीच्या तळागळातील गोरगरीबांचा कोण विचार करणार??
४)मर्यादित विद्यार्थ्यांना गुणवत्तेनुसार प्रवेश द्यायचा असेल तर मग आज गुणवत्ता यादीत येणारे क्वचिचत इतर मागासलेल्या समाजातील आहेत त्याव्यतिरीक्त सर्वच आर्थिकदृष्ट्या सक्षम असणारे गुणवत्ता यादीत आघाडीवर आहेत . कारण इतर मागासलेला समाजवर्ग शिक्षणासाठी आवश्यक तितका खर्च करू शकत नाही.

समानता असायला हवी असं प्रत्येक नेता/विधानसभा सदस्य अवर्जून सांगेल पण त्यासाठी अगोदर सर्व शिक्षण संस्था, कारखाने उद्योगधंदे तसेच अनेक खाजगी प्रकल्प  भारत सरकारच्या स्वाधीन करावे लागतील तद्नंतर भारतीय प्रशासन व्यवस्था यावरती नियंत्रण ठेवेल.
पण यासाठी तेच नेते जे संत्री/मंत्री अर्थात शिक्षण सम्राट व साखर सम्राट विरोध करतील. मग त्यांना समानता नको आहे मग आपणच का उदो उदो करत बसायचे...
यासाठी डॉ बाबासाहेबांनी बाकीच्या देशातील संविधानांचा अभ्यास करुनच प्रत्येक समाजाला हक्क आणि अधिकार संविधानात दिले आहेत तसेच कायदे आणि व्यवस्था सुरळीत चालावी म्हणूनच आरक्षण ही चौकट निर्माण केली आहे.नाहीतर आर्थिक दृष्ट्या सक्षम असलेल्यांनी इतर मागास वर्गीय समाजाला आर्थिकदृष्ट्या कमजोर असणार्या समाजाला जनावरासारखी वागणूक दिली असती.
म्हणून अगोदर आम्हाला आमचे हक्क ST आरक्षण  पाहिजे तरच आम्ही भटांच्या पंगतीला बसू शकतो अन्यथा वेशीच्या खालतं ज्या धनगर समाजाच्या वाड्या(वस्त्या) आहेत त्यामध्ये काहीच आणि कधीच सुधारणा होणार नाही. जिथं सामान्य जनतेला आणि मागासलेल्या समाजाला आपले हक्कच मिळत नसतील तर मग समानतेचे गुण गाणं कितपत योग्य आहे???

          -नितीनराजे अनुसे
अनुसेवाडी ता आटपाडी जि सांगली
         +९१७६६६९९४१२३
  nitsanuse.blogspot.com
nitinrajeanuse.blogspot.com

Wednesday, 22 April 2015

पुन्हा एक नवी दिशा....

⚡👉पुन्हा एक नवी दिशा...✨
अज्ञानाच्या खाईत लोटलेल्या आणि अंधकाराने ग्रासलेल्या माझ्या धनगर समाजाला खरंच एका नव्या दिशेची गरज आहे. अंधश्रद्धेच्या आहारी गेलेल्या धनगर समाजाचं भट-ब्राह्मणांनी पार कंबरडंच मोडून ठेवलंय. भाकित सांगून आणि थापा मारुन भोळ्या भाबड्या धनगर समाजाला देवाधिकाच्या नादी लावायचं अन प्रशासनातील सर्व पदे काबूत ठेवायची हा त्या पाठीमागचा गणिमी कावा आज माझ्या धनगर समाजानं वेळीचं ओळखायला हवा.
५००० वर्षापूर्वी ज्या धनगर समाजानं अक्षरांचा शोध लावला तीच अक्षरे आज धनगर समाजापासून शेकडो मैल दूर आहेत असं का?? का ही अक्षरं आमच्यापर्यंत पोहचू शकली नाहीत?? ब्राह्मण शिक्षित झाले पण अक्षरांचा शोध लावणारे अडाणी कसे काय राहिले याचा विचार तमाम धनगर बांधवांनी करायला हवा.
भर उन्हाळ्यात दिवसभर आग ओकणार्या सुर्याची किरणे झेलत, अंगाची काहिली होत असताना तप्त उन्हात दगडधोंडे अन काटेकुटे तुडवत शेळ्या मेंढ्या राखणार्या आई-वडिलांची अवस्था काय होते याचा विचार माझ्या धनगर समाजातील विद्यार्थी बांधवांनी  कधी केला का? पावसाळ्यामध्ये कधी कधी अवकाळी पावसाचा फटका तर गारांचा सपाटा सहन करावा लागतो. भर हिवाळ्यातील कडक थंडीमध्ये सुद्धा मेंढ्यांची राखण करावीच लागते.  इयत्ता सातवी नंतर उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये लगातार दोन महिने मी शेळ्या-मेंढ्याकडेच होतो मग आज या गावी तर उद्या त्या गावी असा रोजचा प्रवास मी स्वतः अनुभवलाय. त्यामुळे उन्हाळा असो पावसाळा अथवा हिवाळा असो तिन्ही ऋतु मध्ये भयंकर ऊन, धो धो कोसळणारा मुसळधार पाऊस तसेच अंगाचा थरकाप उडवणारी कडक थंडी यांचा विचार न करता मेंढ्यामागे उभे ठाकायचे हे जणू काय धनगर समाजाच्या पाचवीलाच पुजलेलं, शिवाय इतरांसारखी कोणतीही साप्ताहिक अथवा मासिक सुट्टी माझ्या धनगर समाजातील आई-वडिलांना अनुभवता येत नाही त्यामुळेच शाळा असोत अथवा सरकारी कार्यालये यांपासून दूर राहिलेल्या धनगर समाजाला अंधकारातून प्रकाशात यायला तसा खूप उशीर झाला.
आजचे विद्यार्थी अथवा पालक सहज बोलून जातात की शिक्षण घेवून अन् पदव्या हासिल करून काय फायदा?? नोकरीच मिळत नाही. पण त्या सर्वांना माझे एकच सांगणे आहे की बांधवांनो तुम्ही शिक्षण घेताना कधी तुमच्या आई-वडिलांच्या भावनांचा विचार केला होता का???  दिवसभर पायाच्या नडग्या दुखेपर्यंत शेळ्या-मेंढ्यांमागे उभे ठाकलेल्या आणि दुसर्यांच्या शेतात दिवसभर राबराब राबून घाम गाळून ५-५० रु कमविण्यासाठी अपार कष्ट करणार्या आपल्या आई-वडिलांच्या भावना काय असतील याचा विचार कधी केला का?? दिवसभर कष्ट करून थकून भागून घरी परतणार्या आई-वडिलांचा चेहरा अगदी सुकून जातो पण शाळेतून आपला मुलगा/मुलगी घरी आलेत की नाही याचा विचार करत ते झपाझप पावलं टाकत घरी येतात, शाळेतून आल्यानंतर घरासमोर अंगणात खेळत असलेल्या आपल्या मुलाला/मुलीला समोर पाहून त्या सुकलेल्या चेहर्यामध्ये एक विलक्षण आनंद दिसून येतो त्यांच्या ओठांवरती एक हलकसं स्मित हास्य उमटून दिसते, पण त्यांच्या त्या हास्यामध्ये भावना लपलेल्या असतात आणि त्यांना आपल्याकडून काही अपेक्षा देखिल असतात याची जाणीव तुमच्या-माझ्या सारख्यांना असायला हवी. जर तुम्ही आम्ही त्यांच्या भावना समजू शकत नसू तर मग आपल्या आई-वडिलांच्या कष्टाला अन् आपल्या जगण्याला काहीच अर्थ उरत नाही. त्या भावना आणि त्यांच्या  अपेक्षा ज्यांना पुर्ण करता येत नसतील तर स्वतःला त्याची लाज वाटायला हवी. आपल्या मुला/मुलीनं खूप शिकावं IAS/IPS/Engineer/Advocate/Doctor/BUSINESSMEN तसेच इतर उच्च पदावरती पोहचावं, स्वतःचं तसेच आई-वडिलांचं नाव रोषण करावं या त्यांच्या भावना असतात मग त्या भावना ज्यांना ज्यांना समजतात तेच यशस्वी होतात.
ज्यांना आई वडिलांच्या हाताला बसणार्या चटक्याची जाण असते त्याला समाजावरती होणार्या अन्यायाचं भान असतं हे नाकारता येत नाही.
 एकदा आजोळी गेल्यानंतर तेथील शेजारच्या आजीनं मला सांगितलेलं एक वाक्य आयुष्यभर माझ्या लक्षात राहील ते म्हणजे "आयबाप आडाणी हायत म्हणून मेंढरं राखत्याती. पोरांनो तुमी तर शिका खूप मोठं व्हा अन् आय-बा च्या पायातली कुरपं मुजवा नायतर तुमीपण मेंढरं राखत बसचाल" त्या आजीच्या वाक्यामुळं आज माझं जीवन बदलले आहे. माझा मोठेपणा म्हणून सांगत नाही तर आई-वडिलांच्या कष्टाची जाणीव मला झाली होती कारण मी सुद्धा दोन महिने त्यांच्यासोबत गावोगावी फिरुन पोटाची खळगी भरण्यासाठी मेंढ्या राखलेत तर कधी कधी मला एकट्यालाही दिवसभर मेंढ्यासोबत राहायचा योग आला होता कधी कोण्या शेतकर्यांच्या शिव्या तर कधी मार सुद्धा खावा लागायचा. मला ते अनुभवलेले दिवस नको होते म्हणून सरळ बोर्डिंग गाठलं होतं. धनगर समाजातील प्रत्येक विद्यार्थ्यांमध्ये ही उणीव नाही भासली पाहिजे, आई-वडिलांच्या कष्टाची प्रत्येकाला जाण असेल तर उद्या भविष्यात धनगर समाजाची पोरं IAS/IPS/Doctor/Engineer/Advocate/Businessman या क्षेत्रात चमकतील हे सांगायला कोणाची गरज पडणार नाही आणि ही एक दगडावरची रेषा आहे.
जय मल्हार!!! जय अहिल्या!!!
          -नितीनराजे अनुसे
अनुसेवाडी ता आटपाडी जि सांगली
         +९१७६६६९९४१२३
  nitsanuse.blogspot.com
nitinrajeanuse.blogspot.com

Friday, 17 April 2015

आतातरी परिवर्तन घडवायचं का??

 मी आमक्याचा तर तू तमक्याचा,
मी इकडचा तर तू तिकडचा,
एकमेकांना बरबाद करून अन्
एकमेकांचे धिंदोडे काढून
असंच सदैव बोंबलत बसायचं का???
बांधवांनो आतातरी परिवर्तन घडवायचं का??

मी जानकर साहेबांचा तर
तू पडळकर साहेबांचा,
अन् मी आवारे साहेबांचा तर
तू प्रकाश आण्णांचा,
असंच आयुष्यभर लढत बसायचं का??
बांधवांनो आतातरी परिवर्तन घडवायचं का??

सुवर्णाक्षरातील इतिहास विसरून,
आपल्यातल्या आपल्यातच लढून,
एकमेकांची डोकी फोडून,
नाती रक्ताची सहज तोडून,
कुल्हाडी कोयत्यानं लढायचं का??
बांधवांनो परिवर्तन आतातरी घडवायचं का??

स्वतःचा स्वाभिमान गहाण टाकून,
कोणाचीतरी चमचेगीरी करुन,
समाजाचं वाटोळं करत
याचं थोडं अन् त्याचं थोडं करत,
दुसर्यांच्या गुलामगीरीत जगायचं का??
बांधावांनो आतातरी परिवर्तन घडवायचं का??
सांगा मला आतातरी परिवर्तन घडवायचं का??

जय मल्हार!! जय अहिल्या!!!
          -नितीनराजे अनुसे
अनुसेवाडी ता आटपाडी जि सांगली
         +९१७६६६९९४१२३
  nitsanuse.blogspot.com
nitinrajeanuse.blogspot.com
धनगर समाजाची ओळख सांगायची म्हणलं तर चंद्रगुप्त मौर्य पासून राजा सम्राट अशोक ते होळकरशाही अन् आजचा ढाण्या वाघ बापू बिरू वाटेगावकर अर्थात आपले लाडके आप्पा.
धनगर समाजानं जर मनात आणलं तर क्षणात होत्याचं नव्हतं होऊ शकतं पण आजचा धनगर समाजबांधव मात्र व्हाटसप वरतीच भांडत बसलाय.  लाज वाटतेय माझी मला अरे ज्या विस्कटलेल्या धनगर समाजाला एकत्रित आणण्याचा प्रयत्न केला जातोय तेच धनगर समाजबांधव आज व्हाटसप वरती एकत्रित येवून एकमेकांत भांडत आहेत. धन्य आहे बुवा...
एक कट्टर समाजप्रेमी संतोष बिचुकले सर समाजप्रबोधन करत असताना जय मल्हार युवा मंच च्या कार्यकर्त्यांनी त्यांना व रासप च्या कार्यकर्त्यांना काल ग्रुपवरतून रिमूव्ह केले.
का केले कशासाठी केले हे सांगायची गरज पडणार नाही, मी कोणत्याही पक्षाचा समर्थक अथवा कोणत्याही संघटनेचा कार्यकर्ता/सभासद नाही पण अखंड धनगर समाजात जागृति निर्माण करण्यासाठी प्रयत्न करतोय.
कालच्या प्रकारावरुन असं दिसून येतंय की समाजप्रेमींचे विचार दाबण्याचा प्रयत्न केला जातोय. म्हणजे जर सत्य समोर मांडलं तर ते खूपतंय असं म्हणलं तरी हरकत नाही. जर एखाद्या नेत्याचं अथवा लेखकाचं चुकत असेल तर त्यांना त्यांची चूक लक्षात आणून देणं गरजेचं आहे. एखादा विचार मांडला असेल तर त्याचे उत्तर वैचारिक लढाई लढूनच दिले पाहिजे. जर एखादा लेखक अथवा समाजप्रेमी आपली बांजू मांडत असेल तर त्यावरती बरोबर की चूक अशी चर्चा देखील व्हायला हवी, पण जर तुम्ही त्या समाजप्रेमीला ग्रुपवरतून रिमूव्ह करत असाल तर याचा अर्थ असाच होईल की "सत्य हे नेहमीच कडू असते" म्हणजे ती व्यक्ति चांगलं समाजकार्य करत असताना त्या व्यक्तीचे समाजहिताचे विचार तुम्ही अडवण्याचा प्रयत्न करताय. असल्या कृत्यामुळे धनगर समाज आणि परिणामी तुम्ही कधीच पुढे येवू शकणार नाही, उलट अजून ५-५० वर्षे पाठीमागे जाणार हे मात्र नक्की.
तुम्ही कोणत्या पक्षात अथवा संघटनेत काम करता ते महत्वाचे नाही तर तुम्ही माझ्या धनगर समाजासाठी काय करता है महत्वाचं आहे. त्यासाठी एकमेकांचे विचार समजून घ्या आणि कुठेतरी एकत्रित या नाहीतर मग मागलं तसंच म्होरलं असाच प्रकार दिसून येईल.
तसेच परिवर्तन होतंय की परावर्तन होतंय हे कळणार नाही मग तुम्ही कोणाचेतरी बर्तन घासत बसणार हे मात्र नक्की..
जय मल्हार!! जय अहिल्या!!!
          -नितीनराजे अनुसे
अनुसेवाडी ता आटपाडी जि सांगली
         +९१७६६६९९४१२३
  nitsanuse.blogspot.com
nitinrajeanuse.blogspot.com

Saturday, 11 April 2015

सत्य नेहमी कडूच असतं...
आज खरं सांगायला गेलो तर लोकांना बरं वाटत नाही अन् बरं सांगायला गेलो तर खरं वाटत नाही. मग खरंबरं करत कुरबुर व्हायला सुरवात होते. अर्थातच सत्य हमेशा परेशान होता है/करता है। असंच सत्य समाजासमोर मांडण्याचा प्रयत्न केला तो म्हणजे देश स्वातंत्र्य झाल्यापासून धनगर समाजावर सतत अन्यायाचीच कुर्हाड कोसळत आली होती आणि आजही तोच प्रकार आहे. स्व बी के कोकरे साहेबांनी ती अन्यायाची कुर्हाड सावरायचा प्रयत्न करुन बारामतीतून धनगर समाजाला "यशवंत सेना" या संघटनेखाली एकत्रित आणले, पण शरद पवारांच्या मनात पाल चुकचुकली की जर धनगर समाज बी के कोकरे साहेबांच्या नेतृत्वाखाली एकत्र झाला तर मग भविष्यात आपल्याला राजकारण करता येणार नाही. बी के कोकरे साहेबांची आर्थिक बाजू कमकुवत असल्याने पवारांनी काट्यानं काटा काढायचा हा डाव आखला आणि आर्थिक बाबतीने समृद्ध असलेल्या  धनगर समाजातीलच स्व.शेंडगे बापूंना जवळ केले. ही सत्य परिस्थिति समाजासमोर मांडली म्हणजे आम्ही काही गुन्हा केला का?? कारण त्यावेळची अशी परिस्थिति पुन्हा उद्भवू नये हा त्या पाठीमागचा उद्देश्य आहे.
आज जे धनगर नाहीयेत असे लोक मला आर्वाच्च भाषा वापरून शिवीगाळ करताहेत त्या भामट्यांना छाती ठोकपणे सांगतो की बाबांनो ज्यांनी धनगर समाजाची दिशाभुल करून समाजाचं वाटोळं केल त्याबद्दल मी माझं मत मांडलं होतं आणि आपली बाजू स्वतंत्रपणे मांडण्याचा प्रत्येकाला अधिकार देखिल आहे. जर तुमची बाजू स्ट्रॉन्ग असेल तर तुमचं मत तुम्ही मांडू शकता. आर्वाच्च भाषा वापरून आणि घाणेरड्या शिव्या देवून तुम्ही तुमच्यावरती झालेले आई-वडिलांचे संस्कार इतरांना दाखवून देताय हे विसरु नका. मग माझी लायकी काढण्यागोदर तुम्ही स्वतःची लायकी तपासून पहा.
तुम्ही फोन करून सांगताय की आमच्या नेत्यावर टीका करु नका, चांगली गोष्ट आहे. धनगर समाजाच्या कोणत्याही नेत्यावर मी टीका करणार नाही पण जर माझ्या धनगर समाजाचं नाव घेवून जर कोणी बारामतीच्या बोक्याचं तळवे चाटत असेल तर त्याला समाजासमोर उघडा नागडा केल्याशिवाय सोडणार नाही. माझ्या धनगर समाजावरती काय अन्याय होतोय ते पहायचं असेल तर धनगर समाजात जन्माला या.
मी कोणत्या पक्षाचा समर्थक नाही, कोणत्याही संघटनेचा सभासद देखिल नाही अन् कोणत्या नेत्याचा दलालही नाही. कोणत्या नेत्याकडून मी चहाची देखिल अपेक्षा करत नाही पण जे बाजारबुणगे धनगर समाजाची चमचेगीरी करुन धनगर समाजाला लांडग्यांच्या दावणीला बांधायचे काम करताहेत त्या त्या नेत्यांनी एकतर आपले विचार बदलावेत नाहीतर राजकीय सन्यास घ्यावा कारण माझ्या धनगर समाजाचं नाव घ्यायचा देखिल अधिकार त्यांना नाही.
मला फोन करून अथवा मेसेज पाठवून धमक्या द्यायचं बंद करा. असल्या फालतु आणि पोकळ धमक्यांना मी कधी घाबरत नाही. आणि असल्या धमक्यांना घाबरून मी माझं समाजकार्य सोडणार नाही. मी एखादा निर्णय घेत असेल तर मागचा-पुढचा विचार करूनच निर्णय घेतो. त्यानंतर मग आर या पार पुढे काय प्रसंग उद्भवतील याचीही मला जाणीव आहे आणि त्यावरती उपाय सुद्धा आहेत. असे निर्भीडपणे आपले मत मांडायला हिम्मत तर लागतेच पण तेवढी धमक देखिल असायला हवी. एखाद्या पालतू कुत्र्यानं सांगाव की आमुक-आमक्या नेत्यावर टीका करु नका, बाकी कोणावरही कर. पण जर डोळ्यादेखत माझ्या समाजाचं बाजारीकरण आणि वाटोळं होत असेल तर मुग गिळून गप्प बसायला मी काय गांडूची औलाद नाही हे तुम्ही विसरु नका. समाजाला योग्य दिशा द्यायचं काम माझ्यासारखेच भरपूर विचारवंत करताहेत आणि त्यांना सुद्धा अशा गोष्टींचा सामना करावा लागतोय. आज समाजामध्ये जागृति झाली आहे त्यामुळे दलालांना समाज चांगलाच ओळखून आहे. माझ्या विचारामुळे  याचे काय परिणाम होतील हे तुम्ही मला सांगत बसू नका कारण लहानपणापासूनच मी परिणाम झेलत आलोय त्यामुळे परिणामाची भाषा मला शिकवू नका. तुमची असभ्य भाषा ऐकुण देखिल मी सभ्यपणे तुमच्याशी संवाद साधत असेल तर त्याचवेळी तुम्हाला अक्कल यायला हवी होती तरीपण तुम्ही जर शिव्या देवून मला धमक्या देत असाल तर मग माझा सळसळत्या रक्ताचा अन् अहिल्येच्या भक्ताचा धनगरी हिसका दाखवायला मला क्षणाचाही वेळ लागणार नाही.
सर्व गोष्टीचा अंत म्हणून धनगर शांत आहे. तर तुम्ही आमचा अंत बघू नका नाहीतर....याद राखा...
खबरदार....!!!
जय मल्हार!!! जय अहिल्या!!!
          -नितीनराजे अनुसे
अनुसेवाडी ता आटपाडी जि सांगली
         +९१७६६६९९४१२३
  nitsanuse.blogspot.com
nitinrajeanuse.blogspot.com

Monday, 6 April 2015

धनगर समाजाचं बाजारीकरण होतंय हे कीतीजरी ओरडून ओरडून सांगितलं तर बेजबाबदार असलेल्या माझ्या धनगर समाजाला याचं काहीच वाटत नाही. मी आमुक-आमक्याच्या गटाचा तर तु तमुक-तमक्याच्या गटाचा असं विभाजन झालंयअन् एकमेकांच्या विरोधात लढायलाही तयार झालोय. अरे एकाच रक्ताच्या अन् एकाच जातीत जन्माला आलेल्या औलादी आपण आज गट-तट करत बसलोय. एकाच आईच्या पोटी जन्माला आलेल्या भावा-भावाचं पटत नाही, भाव-भावकी अन् गावागावात देखिल असंच चाल्लय जणू काय जन्मापासूनच एकमेकांचे कट्टर दुश्मनच आहोत.
कधीतरी आत्मचिंतन करा मनन करा, भावभावकीत अन् गावकीत चर्चा करा ती पण स्वतःच्या विचारानंच करायला हवी. कोणत्या भामट्या प्रस्थापितांच्या विचारातून अथवा माजलेल्या प्रस्थापित नेत्यांच्या सांगण्यावरून नको.
जरा आपल्या थोर महापुरुषांचा इतिहास आठवा, कुठं ती राजेशाही अन् कुठं तुम्ही जगताय ती तुमची गुलामगीरी. लाज वाटायला पाहिजे तुम्हा-आम्हाला अरे एकेकाळी राजा समाज असणारी आपली औलाद आज प्रस्थापित घराणेशाहींच्या गुलामगीरीत वावरतेय, राजेशाहीच्या थाटामध्ये जगणारे आपण दुश्मनांच्या छाताडावर थय्याथय्या नाचणारे आपण मर्द रांगडं गडी आज प्रस्थापितांची गुलामगीरी अन् चमचेगीरी करत बसलो आहोत. अरे आज तुम्हाला जर आपल्या पुर्वजांसारखं  राजेशाही थाटात जगता येत नसेल तर त्यापेक्षा मेल्यालं बरं हे बोललो तर मला वावगं ठरणार नाही. अखंड भारत एका छत्रीखाली आणणारे राजा सम्राट अशोक, अटकेपार झेंडे फडकवणारे राजे मल्हारराव होळकर, २८ वर्षे दिल्लीच्या तख्तावर बसून हिंदुस्तानच्या विशाल भूभागावर राज्य करणारी रणरागीणी राजमाता अहिल्यामाई होळकर, इंग्रजांच्या विरोधात लढताना  न हारता १८ लढाया जिंकलेले व कोणत्याही दुश्मनावर चाल करत कधीही पराभव न पत्करता लढलेले महाराजाधिराज शुरवीर राजे यशवंतराव होळकर, वीरांगना ताराबाई होळकर व वीरांगना भिमाई होळकर, अशा या धनगर समाजातील महापुरूषांचा इतिहास सुवर्णाक्षरात कोरुन ठेवलेला असताना त्याच राजा समाजात जन्माला आलेल्या तुम्ही-आम्ही औलादी कोणतं जगणं जगतोय याचीच लाज वाटतेय आम्हाला.
"अरे झुकल्या गेल्या होत्या माना माझ्या धनगर जातीतील राजांच्या दरबारी, पण कोणापुढंही न झुकणारी ही माझी औलाद धनगरी"
 मग प्रस्थापित पवार पाटील देशमुख ठाकरेंच्या चपला उचलणार्यांनो तुम्हाला माझ्या धनगर समाजाचं नाव घ्यायचा देखिल अधिकार राहनार नाही. कारण दुसर्यांपुढे झुकणारे माझ्या धनगर समाजात जन्माला येत नाहीत त्यांनी त्यांची जात तपासून घ्यावी.
माझ्या धनगर समाजाला उल्लू बनवायचं तुम्ही सोडून द्या, माझ्या भोळ्या-भाबड्या धनगर समाजाला फसवून प्रस्थापितांच्या दावणीला बांधायचं तुम्ही सोडून द्या. आजपर्यंत धनगर समाजाच्या नावावरती तुम्ही तुमची घरं भरलीत, तुम्ही माझ्या धनगर समाजाचं काहीच भलं केलं नाही उलट तुमचा स्वार्थ तुम्ही साधला आहात. माझ्या बोलण्याचा कदाचित तुम्हाला राग येत असेल तर मग शहाणे व्हा अन् प्रस्थापितांची गुलामगीरी  चमचेगीरी, चाकरी करायचं सोडून पिवळ्या झेंड्याखाली एकत्रित  या.
 आज तुम्ही-आम्ही जर एकत्रित येवून जर लढू लागलो तर या जगातील कोणतीही शक्ति तुम्हाला आडवी येणार नाही, तुम्हाला कोणी हरवू शकणार नाही, जर ठरवलं आणि एकजुटीनं लढलो तर आपले हक्क आपल्याला मिळतीलच पण या देशावरती पुन्हा एकदा धनगर समाज राज्य करेल अन् माझ्या राजा सम्राट अशोकाचं स्वप्न साकार होईल. त्यासाठी एकत्रित या नाहीतर तुम्हाला भंडार्राची शपथ इथून पुढं माझ्या धनगर समाजाचं नाव जरी घेतलं तर खबरदार.... आणि याद राखा....
तलवारी हातात घ्यायची वेळ आमच्यावर येवू देवू नका...
जय मल्हार!!! जय अहिल्या!!!
          -नितीनराजे अनुसे
अनुसेवाडी ता आटपाडी जि सांगली
         +९१७६६६९९४१२३
  nitsanuse.blogspot.com
nitinrajeanuse.blogspot.com

Monday, 30 March 2015

बांधवांनो मला तुमच्याशी थोडसं बोलायचंय...
धनगर समाज संघटन करण्यासाठी तुम्ही आम्ही झटतोय हे किमान व्हाटसप वरतून तरी दिसून येतय  पण प्रत्यक्षात काय परिस्थिति आहे याबद्दल मला काही कल्पना नाही बुवा...
खूप वर्षापासून पाहत आलोय या महाराष्ट्र राज्यात धनगर समाजाच्या सतराशे साठ संघटना आहेत. कोणी आमुक संघटना तर एखादी तमुक संघटना.... बांधवांनो या सर्व संघटनांचं उद्धीष्ट काय आहे ते  माझ्या धनगर समाजाला कळू द्यात तरी...  संघटनेच्या अध्यक्षांनी काय म्हणून संघटना तयार करण्याचं ठरवलं??? मग संघटनेची उद्धीष्टे तर असतीलच ना???
धनगर समाजाला एकत्रित करण्याचं उद्धीष्ट तर प्रत्येक संघटनेचं आहे. त्याव्यतिरीक्त धनगर समाजाच्या न्याय व हक्कासाठी लढा देणं. धनगर समाजावरती अन्याय होत असेल तर त्यांच्या हाकेला धावून जाणं. धनगर समाजाची व्यथा विधानभवनात आणि संसदभवनेत मांडण्यासाठी धडपड करणं. सामाजिक, शैक्षणिक आणि व्यावसायिक क्षेत्रात धनगर समाजाला प्रेरित करणं तसेच मार्गदर्शन करणं ...इ.  सर्व संघटनांची याव्यतिरीक्त काही उद्धिष्टं असतीलच अथवा नसतीलही.
पण या संघटना गाव पातळी तालुका पातळी आणि जिल्हा पातळीवर धनगर समाजासाठीच कार्य करतात कोणी धनगर समाजाच्या विरोधात करत नाही. आपण सर्वजण एकाच रक्ताची माणसं आहोत, धनगर समाजातील थोर महापुरुषांच्या जातीत जन्माला आलेल्या आपण औलादी आहोत याची जाणीव तुम्हा-आम्हाला आहेच, मग सर्व संघटनांचं आणि संघटनांच्या पदाधिकार्यांचं कार्य एकच आहे पण मार्ग मात्र वेगळे आहेत. अशा कितीतरी संघटना या महाराष्ट्रात उदयास आल्या आणि गेल्याही. मग तुम्ही काय साध्य करू इच्छिता हे समाजासमोर मांडणं गरजेचं आहे असं मला वाटतं..
आजपर्यंत आपण प्रस्थापितांनाच शिव्या देत आलोय पण आतातरी जरा अक्कल येवू द्या. धनगर समाजाचं विभाजन कोणी प्रस्थापित नेते करत नाहीत तर धनगर समाजातीलच स्वतःला हुशार समजणारे समाजबांधव धनगर समाजाचं विभाजन करताहेत. संघटना चालकांनी आपल्या उद्धिष्टांमध्ये सरळ उल्लेख केला आहे की धनगर समाजाला एकत्र करणे. पण संघटना चालक स्वतः या मुद्द्यावरती ठाम आहेत का??? धनगर समाजानं एकत्र व्हावं असं म्हणत असतानाच तालुका आणि जिल्हा पातळीवरील धनगर समाजातील संघटना कधी एकत्र आलेत का??? त्या त्या संघटनेतील समाजबांधव धनगरच आहेत की दुसरे कोणी आहेत.?? जर धनगरच असतील तर मग त्यांच्या विचाराशी तुम्ही सहमत का होत नाही??? एका संघटनेतील नेते व पदाधिकारी दुसर्या संघटनेतील नेत्यांशी व पदाधिकार्यांशी कधी संपर्क साधतात का??
या सर्व प्रश्नांचं उत्तर नकारात्मक येईल कारण,
त्या त्या संघटनेचे चालक दुसर्या संघटनेतील नेत्यांशी खुन्नसपणे वागतात, एखाद्या नेत्याबद्दल बोलायला लागलं की त्या संघटनेचं चालक म्हणतात की मला त्या संबंधित नेत्याबद्दल चांगलही बोललेलं आवडणार नाही आणि वाईटही... जर तुम्ही धनगर समाजातील नेत्यांचा (प्रस्थापितांच्या दावणीला बांधलेल्या व्यतिरीक्त नेत्यांचा) आदर करत नसाल, सन्मान करत नसाल तर मग तुमच्या संघटनांचं पहिलंच उद्दिष्ट डळमळित झालं म्हणून समजा. तुम्ही जर राज्यपातळीवर एकत्रित पणे धनगर समाजाच्या हक्कासाठी चर्चा करू शकत नसाल लढू शकत नसाल तर मग त्या संघटनांमधूनच धनगर समाजाचं विभाजन होतंय आणि हीच गोम प्रस्थापितांच्या लक्षात आल्यामुळं धनगर समाजाच्या मतांचा फायदा त्या हरामखोर प्रस्थापितांना होतोय, याचा कधीतरी विचार करा.  मग धनगर समाजाच्या एकिकरणासाठी तुमची चाललेली उठाठेव व्यर्थच म्हणावी लागेल. धनगर समाजाला एकत्र आणायचे असेल तर त्या त्या संघटनेच्या पदाधिकार्यांनी स्वतः पेक्षा समाजाचा विचार करावा. जर तुम्हाला पदं महत्वाची वाटत असतील तर माझ्या भोळ्या भाबड्या धनगर समाजाचं नुकसान करू नका त्यांनातरी किमान एकत्रित येवून योग्य दिशा ठरवू द्या,
त्या त्या संघटनेतील नेत्यांनी एकमेकांचा आदर न करता वयाचं भान न ठेवता लहान असो अथवा मोठा, आरं तुरंची भाषा करून "मला त्याच्याबद्दल बोलल्यालं आवडत नाही मग चांगले असो अथवा वाईट" असं जर तुम्ही म्हणत बसला तर मग तुमची लायकी काय आहे ते आजच्या यूवा वर्गाला सांगायची गरज पडणार नाही. तुम्हाला जर एकमेकांत खुन्नस करत बसायचं असेल तर तसंच करत बसा पण लक्षात ठेवा तुमच्या पुढच्या शंभर पीढ्या सुद्धा सुधरणार नाहीत त्या पुढच्या पीढ्यापण खुन्नस करत बसतील आणि धनगर समाजाचं असंच विभाजन होत राहील. त्यासाठी  "आधीच मर्कट त्यात मद्य प्राशन केलं" अशी समाजाची दुरावस्था करू नका.
नाहीतर मग शेवटी सर्वजन म्हणताहेतच "धनगरी जत्रा अन् कारभारी सतरा"
जय मल्हार!! जय अहिल्या!!!
         नितीनराजे अनुसे
अनुसेवाडी ता आटपाडी जि सांगली
       +917666994123
nitsanuse.blogspot.com

Wednesday, 25 March 2015

धनगर समाजाची अवस्था.,,

मला प्रसिद्धि पाहिजे किंवा मला समाजावरती माझा छाप पाडायचाय म्हणून मी लिहीत नाही. मला यामधून माझा स्वतःचा स्वार्थ साधायचा नाही. मला हे सर्व करायची गरज देखिल नाही मी कोणावरती अवलंबून नाही मला जे काय पाहिजे होतं ते सर्व माझ्याकडे आहे.
आज मी स्वाभिमानाने जगतोय कोणाच्या चहाच्या देखिल मिंद्यात पडत नाही.
मी समाजाला एकत्र करण्यासाठी मिळेल त्या वेळेत समाज प्रबोधन करतोय. कोणत्याही धनगर नेत्यांना शिव्या देवून मी स्वतःवरती रोष वाढवून घेत नाही. समाजानं आपलं नेतृत्व स्वतः केलं पाहिजे दुसर्यांच्या सांगण्यावरतून नव्हे.
मेंढ्यांचं नेतृत्व मेंढपाळानीच केलं तर मेंढ्यांचं रक्षण होईल पण तेच नेतृत्व जर लांडग्यांनी केलं तर मेंढ्यांचं भक्षण होईल. समाजाची सुद्धा अशीच अवस्था आहे जर धनगर समाजातील नेत्यांना धनगर समाजाचं नेतृत्व करायचं असेल तर त्यांनी लांडग्यांचं विचार मनातून काढले पाहिजेत. तिकडे लांडग्यांच्या गुहेत जावून प्रशिक्षण घ्यायचं, मेंढ्यांना कशी फूस लावून त्यांना लांडग्यांच्या दावणीला कसं ओढून आणता येईल याचा प्रयत्न प्रस्थापित नेते करत असतानाच धनगर समाजातील नेत्यांनी त्यांची पाठराखन करणं हा धनगर समाजबांधवांच्या पाठीत खंजीर खूपसण्यासारखाच प्रकार आहे.
धनगर समाजाचे खरे नेते कोण आणि धनगर समाजातील दलाल कोण याचा पर्दाफाश समाजबांधवांनी करून त्याची शहानिशा केलेली आहे. आजचा धनगर समाजातील यूवा वर्ग जागरूक झाल्यानं धनगर समाजासाठी झटणारा आणि झगडणारा नेता कोण हे सांगायची गरज पडणार नाही. समाजातील नेत्यांना जर दलाल म्हणवून घ्यायचं नसेल तर त्यांनी विचार करून त्या त्या पक्षातून राजीनामं देवून बाहेर पडा असंच आजपर्यंत सांगत आलोय लिहीत आलोय, पण त्या त्या  नेत्यांच्या समर्थकांकडून माझ्यावरती टीका केली जाते आहे की मी धनगर समाजातील नेत्यांना शिव्या देवून स्वतःची प्रसिद्धि करून घेतोय.
बांधवांनो धनगर समाजानं आणि धनगर समाजातील नेत्यांनी कुठंतरी एकत्रित यायला पाहिजे म्हणून माझ्यासारखेच कीतीतरी समाजबांधव यासाठी झटताहेत. डोळ्यांत तेल घालून लेखक/विचारवंत/अभ्यासक जीव तोडून तोडून समाजासाठीच लिहीताहेत पण त्याचा गैरसमज केला जातोय. समाजाच्या एकत्रिकरणासाठी कार्यरत असलेल्या समाज बांधवांवरती समाजविभाजन करतोय असे गंभीर आरोप केले जाताहेत. दुसर्यांचं झेंडे स्वतःच्या खांद्यावर वागवताना यांना लाज वाटत नाही पण स्वतःचं झेंडं खांद्यावर घ्यायला यांना लाज वाटतेय हे समाजासमोर मांडलं म्हणजे आम्ही त्यांना शिव्या देतोय असं समाजातील काही व्यक्तींना वाटतंय.
 धनगर समाजाला आरक्षण मागायच्या ऐवजी आमदारकी मागत असल्याचे आरोप कालच्या मोर्चातून झाले पण बांधवांनो जर आपलं हक्क मिळवायचं असतील तर नुसतंच बाहेरून लढून चालनार नाही तर विधानभवनात आणि संसदेत भांडता आलं पाहिजे. आजपर्यंत विधानभवनात आणि संसदेत धनगर समाजाच्या आरक्षणावरती बोलणारा आणि भांडणारा सक्षम हुशार अभ्यासक असा एकही सदस्य नव्हता म्हणूनच धनगर साजाचा ST आरक्षण अंमलबजावणीचा मुद्दा तसाच धूळ खात पडलाय...
पण विधानभवनात धनगर समाजाच्या हक्क्साठी भांडणार्या नेत्याला आडवण्यासाठी काही धूर्त लोकांनी धनगर समाजातील इतर नेत्यांचा खांद्यावर बंदूक ठेवण्यासाठी वापर करून घेतला आणि आजही करताहेत. मग त्या प्रस्थापित नेत्यांची धोतरं सांभळणार्यांना काय म्हणायचं ते समाज बांधवच ठरवतील....
जय मल्हार जय अहिल्या
        -नितीनराजे अनुसे
अनुसेवाडी ता आटपाडी जि सांगली
      +917666994123
nitsanuse.blogspot.com

२३ मार्चचा मोर्चा..


अब्रुचे खोबरे व्हावे असाच काही उचित प्रकार आजच्या धनगर समाजाच्या ST आरक्षणाच्या अंमलबजावणीसाठी काढलेल्या मोर्चातून दिसून आला. आज धनगर समाजाला चारित्र्यसंपन्न नेतृत्वाची गरज असताना दुसर्यांच्या ईशारावरती नाचनार्या नेत्यांना आज धनगर समाजानं त्यांना त्यांची जागाच दाखवून दिली. कदाचित आरक्षणाऐवजी हेच त्या नेत्यांना सिद्ध करुन दाखवायचं होतं की काय?? हा प्रश्न मला पडलाय... बारामतीच्या मोर्चातून अख्ख्या महाराष्ट्राला धनगर समाजाची ताकद दिसून आली होती. अख्ख्या भारताचं लक्ष धनगर समाजानं केंद्रित करून घेतलं होतं, बारामतीचा मोर्चा हा अनपेक्षितपणेच होता, त्याचं काही आयोजनही केलं नव्हतं तरीही ५,००,००० (पाच लाखांवरती) त्याहून जास्त धनगर समाज स्वखर्चानं बारामतीमध्ये एकवटला गेला होता पण आजचा मुंबई विधानभवनावलील मोर्चा हा पूर्वनियोजित असताना, बारामतीकरांकडून दोन कोटी रुपयांची मदत असूनदेखिल ५०० ते ७०० (मी १०००मानून चालतो) इतकाच समाजबांधव आजच्या मोर्चाला उपस्थित होता. कीती दुर्दैवाची गोष्ट म्हणावी लागेल.
आजचा मोर्चा वक्रतुंडाच्या कृपेनं आयोजित केल्यानं धनगर समाजानं देखिल मोर्चाकडून तोंड वाकडं केलं.
यामध्ये धनगर समाजाचं काही नुकसान नाही झालं पण ज्यांन या मोर्चाचं आयोजन केलं होतं ज्यांनी या मोर्चाचं नेतृत्व केलं होतं त्या त्या रथी महारथींच्या मनामध्ये एक आत्मविश्वास निर्माण झाला तो म्हणजे राजकीय संन्यास घ्यायचा.
आज धनगर समाज जागा झालाय समाजामध्ये परिवर्तन घडतंय, विशेषता यूवा वर्ग जागरुक झालाय. आजपर्यंत डोंगर-दर्यातून माळरानावर शेळ्या-मेंढ्या राखणार्या अडाणी/अज्ञानी भोळ्या-भाबड्या माझ्या धनगर समाजाला फसवून लांडग्यांच्या दावणीला बांधायचं काम हे धनगर समाजातील नेते मंडळींनी केलं. शेता-मळ्यात बैलासारखं राब राब राबणार्या माझ्या शेतकर्यांना फसवायचं काम हे दलालांनी केलंय. त्यामुळे धनगर समाजाचे नेते कोण आणि समाजातील दलाल कोण हे आजच्या तरुन पीढीला सांगायची गरज पडणार नाही. आजचा मोर्चा हा धनगर समाजातील नेत्यांच्या विचाराने आणि पुढाकाराने आयोजित केला असता तर आझाद मैदानावर उभं राहायला जागा पुरली नसती. या मोर्चाचं आयोजन केल्याचं पत्रकार परिषदेत सांगितलं गेलं होतं तेव्हा त्याच्या दुसर्या दिवसी मी सांगितलं होतं की धनगर समाजातील नेत्यांना जर धनगर समाजाचं नेतृत्व करायचं असेल तर आपापल्या पक्षाचं राजीनामं द्या आणि पिवळा झेंडा खाद्यावर घेवून मगच तुम्ही धनगर समाजाचं नेतृत्व करा. जर त्या त्या नेत्यांनी राजीनामं दिलं असतं तर आज १५ लाखाच्यावरती धनगर समाज एकत्रित करण्याची जबाबदारी माझी होती असंही मी सांगितलं होतं. पण हा मोर्चाच बारामतीकरांच्या सांगण्यावरुन आयोजित केला होता त्यामुळं राजीनामं कोणाकडे द्यायचे तिथंच घोडं पेंड खात होतं.
संपूर्ण महाराष्ट्रभर दौरे करून धनगर समाजातील नेत्यांना आणि समाज बांधवांना आवातनं द्यायची वेळ ही बारामतीकरांवरती आली. हीच धनगर समाजाची ताकत आणि हाच विजय आहे. तुम्हाला धनगर समाजासाठी झटायचं असेल झगडायचं असेल तर धनगर समाजातल्या प्रत्येक नेत्यांना, होतकरूंना  आणि स्वाभिमानी तरूनांना विचारुनच तुम्ही समाजबद्दलचा निर्णय घ्या, समाजासाठीचा निर्णय हा समाजबांधवांनाच विचारून घ्या बारामतीच्या बोक्याला विचारून तुमचे प्रश्न सुटणार नाहीत उलट समस्या वाढत जातील त्यासाठी आजचा अनुभव आयुष्यभर तुमच्या लक्षात राहूद्या.
स्व.बी के कोकरे साहेबांचा राजकीय खून करून  माजी मंत्री स्व शिवाजीराव(बापू) शेंडगेना जवळ करुन धनगर समाजाचं नेतृत्व खुडून टाकायचं पाप बारामतीच्या बोक्यानं केलंय हे तुम्हीही नाकारु शकत नाही आणि आज मा.महादेवजी जानकर साहेबांचं वाढतं वर्चस्व रोखण्यासाठी धनगर समाजातील नेत्यांना फूस लावायचं राजकारण बारामतीचा बोका करतोय म्हणजे 'काट्यानं काटा काढायचा' हे उघड्या डोळ्यांनी सरळ सरळ दिसून येतंय. त्यांना फक्त जानकर साहेबांचीच भीती वाटतेय असं नाही तर संपूर्ण धनगर समाजाची त्यांना भीती वाटतेय म्हणूनच धनगर समाजाला एका नव्हे तर दोन दोन घोंगडीनं झोपू घाला असं म्हणणार्या यशवंतराव चव्हाणांची ही राजकीय औलाद आहे ते  विसरता कामा नये.
राजकारण आणि समाजकारण करायचं असेल तर चारित्र्यसंपन्न नेतृत्व तुमच्या अंगी असायला पाहिजे तरच समाज तुम्हाला सलाम करेल नाहीतर कोणाचेतरी बुट चाटायची सवय तुम्हाला असेल तर समाज तुम्हाला बुटाखाली घ्यायला मागंपुढं बघणार नाही.
तुम्हा सर्वांना माहीत आहेच की घरातील योग्य आणि चांगले निर्णय फक्त आईच घेवू शकते कारण बाजूची बाई मात्र संसारात विष कालवायचा प्रयत्न करते. म्हणून धनगर समाजानं आपली आई ओळखायला शिकलं पाहिजे जर बारामतीच्या बाईच्या नादाला लागाल तर आपल्या पुढच्या शंभर पीढ्या त्यांची धोतरं लुगडी सांभाळत बसतील म्हणूनच म्हणतो बांधवांनो आजतरी एकत्रित या अजूनही वेळ गेलेली नाही.
जय मल्हार!! जय अहिल्या!!!
-नितीनराजे अनुसे
अनुसेवाडी ता आटपाडी जि सांगली
    +917666994123
nitsanuse.blogspot.com

Sunday, 22 March 2015

एक सत्य...

मला कोणाच्या भावना दुखवायच्या नाहीत. मला  कोणावरती छाप पाडायची आहे म्हणून मी लिहीत नाही, मी काव्य करतो त्यातून मी काय तुम्हाला भुरळ पाडायची म्हणून करत नाही. पण मनात शल्य बोचतंय ते ज्यांनी आपल्या समाजाचं आजपर्यंत वाटोळं केलं आणि आज त्यांच्याच सांगण्यावरून मोर्चा काढला जातोय.
आदरणीय प्रकाश आण्णांनी  माझा बांध रेटलाय म्हणून मी मोर्चाला विरोध करतोय अशातला भाग नाही. मी काय कोणत्या बीजेपी वाल्यांची चमचेगीरी करत नाही.  किंवा कोणाच्या बापाचं मी काही खाल्लय म्हणून मोर्चाला विरोध करतोय अशातला विषय नाही. जे बीजेपी मद्ये नाहीत तेच दलाल आहेत असंही मी बोललो नाही, पण समाजासाठी त्या त्या पक्षाची दलाली सोडून समाजासाठी एकत्रित यावे म्हणून मी संघर्ष करतोय, झटतोय आणि झगडतोय.
आरक्षण आम्हाला पाहिजेच पाहिजे, मग ते आरक्षण कसं मिळवायचं ते पण आम्हाला चांगलंच माहीत आहे.
आज धनगर समाजाचा पुळका येतोय म्हणून तुम्ही मोर्चा काढत नाही तर धनगर समाजाच्या विश्वासास पात्र नसलेल्या पवारांचं राजकीय धोतर सांभाळायचं म्हणून तुम्ही मोर्चाचं नेतृत्व करताय पण त्या रथाचा सारथी दुसरा तिसरा कोणी नसून ६५ वर्षे धनगर समाजाचा विश्वासघात करणारे शरद पवार आहेत म्हणून आम्ही मोर्चाला विरोध करतोय.
मला फोन येवू लागले की सर्व धनगर नेत्यांना विचारलं होतं पण त्यांनी नकार दिला कारण ते सत्ताधारी आहेत. जानकर साहेबांनी पण नकार दिला असं मला ऐकायला मिळालं. धनगर समाजातील नेत्यांना न विचारता मोर्चाचं आयोजन केल्यानंतर जर तुम्ही धनगर समाजातील नेत्यांना आवातनं द्यायला जाताय म्हणजे "वरातीमागून घोडे" असंच म्हणावं लागल.
आणि बरोबर आहे जानकर साहेब या मोर्चाला नकार देतिलच कारण २५ वर्षापासून हा माणूस घरादाराचा त्याग करून समाजासाठी धडपडतोय त्यावेळी जानकर साहेब तुम्हाला दिसले नव्हते का?? माढा लोकसभा मतदारसंघात जानकर साहेब निवडणूक लढवत होते त्यावेळी वर्तमानपत्रातून आणि न्यूज चैनल वरतून बातम्या धडकायच्या की
"माढा मतदारसंघात केंद्रीय कृषिमंत्री शरद पवारांच्या विरोधात मा. महादेवजी जानकर साहेब निवडणूक लढत आहेत, जानकर साहेब हे एक धनगर समाजाचे नेते आहेत."
मग धनगर समाजाचा उगंच पुळका आणनारे त्यावेळी काय शेण खात होते का??? त्यावेळी तुम्हाला धनगर समाज आठवला नाही तर पवारांचं राजकीय धोतर सांभाळत बसला आणि आज तुम्हाला धनगर समाज  आठवायला लागला. नुसतंच व्हाटसप आणि फेसबुक वरतून विकासाच्या न् आरक्षणाच्या पोकळ बढाया मारणार्यांनो तुम्ही कधी या गोष्टीचा अभ्यास केलाय का??
समाज संघटन करायचं आहे तर मग ज्यांनी आजपर्यंत धनगर समाजाचा वापर करून घेतला आणि समाजाचं वाटोळं केलं त्या बारामतीकरांच्या सल्ल्यानं मोर्चा आयोजित करायचा अन् पुन्हा धनगर समाजातील नेत्यांना आमंत्रण द्यायचं हीच निर्णयप्रक्रिया आहे का?? त्याअगोदर धनगर समाजातील नेत्यांनी एकत्र बसून जर हा मोर्चा आयोजित केला असता तर आज लाखच काय १५ लाखाच्या वरती धनगर समाजाला मुंबई मध्ये आणलं असतं हे ओपन चैलेंज मी त्याचवेळी दिलं होतं.
मला काहीजण म्हणाले तुम्ही काय स्वतःला चाणक्य समजता का?? त्यांना सांगू इच्छितो की मी काय स्वतःला चाणक्य समजत नाही पण कोणत्याही ऐर्यागैर्याला न जुमानता चाणक्यासारखे माझेही विचार समाजासमोर मांडायचं धाडस मी करतोय.
मी धनगर समाजाचं विभाजन करतोय असंही माझ्यावरती आरोप होऊ लागले. नक्की समाजाचं विभाजन कोण करतंय याचा अभ्यास तुम्ही कधी केला आहात का?? आजपर्यंत धनगर समाजानं एकत्र यावं म्हणून मी संघर्ष करतोय. जर धनगर समाजाचं विभाजन होऊ द्यायचं नसेल तर त्या पक्षातील सर्व नेत्यांना सांगा की तुम्ही आपापले राजीनामे तुमच्या पक्षश्रेंष्ठीकडे द्या. आणि पिवळ्या झेंड्याखाली एकत्रित या तरच समाजाचं विभाजन न होता एकत्रिकरण होईल त्यावेळी तुम्ही माझ्या धनगर समाजाचं नेतृत्व करण्या लायक आहात. अन्यथा तुम्ही माझ्या धनगर समाजाचं नेतृत्व करु नका. आणि भोळ्या भाबड्या माझ्या धनगर समाजाला लांडग्यांच्या दावणीला बांधायचं पाप तुम्ही करू नका.
       -नितीनराजे अनुसे
अनुसेवाडी ता आटपाडी जि सांगली
    +917666994123
nitsanuse.blogspot.com

गुपित उद्याच्या मोर्चाचं...

गुपित उद्याच्या मोर्चाचं...
बांधवांनो खूप दिवसांपूर्वीपासून मी सांगत आलोय  आणि आजही आवर्जून सांगतोय. उद्या दि.२३ मार्च २०१५ रोजी धनगर समाजाला ST आरक्षणाची आंमलबजावणी व्हावी म्हणून विधानभवनावर मोर्चा काढण्यात येतोय. हा धनगर समाज प्रणित मोर्चा नसून राष्ट्रवादी प्रणित मोर्चा आहे.
बांधवांनो हा मोर्चा म्हणजे समाजाविषयी तळमळ आहे म्हणून आयोजित केला नाही तर यामागे खूप मोठं राजकारण दडलय...
धनगर समाजातील वरिष्ठ नेते त्याचप्रमाणे जेष्ठ विचारवंत आणि वक्ते/लेखक सुद्धा या मोर्चामध्ये सहभागी होणार नाहीत आणि  मी सुद्धा या मोर्चामध्ये सहभाग घेणार नाही. आमचा उघडपणे या मोर्चाला विरोध आहे. आरक्षण आम्हाला हवं आहे पण धनगर समाजातील नेत्यांना डावलून बारामतीकरांच्या सांगण्यावरुन जर हा मोर्चा आयोजित केला जात असेल तर या मोर्चामध्ये आम्ही काय म्हणून सहभाग घ्यायचा.?? आम्ही काय समाजाचं दलाल नाही. आम्ही काय कोणाची भडवेगीरी अन् चमचेगीरी करत नाही.
हा मोर्चा समाजाच्या हितासाठी नाही, समाजाचा पूळका येतोय म्हणूनही नाही तर पाठीमागच्या विधानसभा निवडणुकीत धनगर समाजामुळे पवारांना एकप्रकारचा झटका बसला होता म्हणून भोळ्या भाबड्या धनगर समाजाला फसवून त्यांना राष्ट्रवादीच्या दावणीला बांधायचं षडयंत्र रचलं जात आहे. ज्या राष्ट्रवादीने आजपर्यंत तुमच्या आमच्या पोटावरती पाय देवून राजकारण केलं आणि सत्ता हातातून गेल्यावर धनगर समाजाला फसवून आपल्या जाळ्यात कसं ओढायचं हा डाव पवारांनी आखला आणि शेंडगे, डांगे, वडकुते रूपनवर यांसारख्या नेत्यांचा (दलालांचा) वापर करून धनगर समाजाला आपल्याजवळ कसं ठेवता येईल या पवार नीतीचा वापर केला.
बांधवांनो मी पदरचं सांगतोय किंवा माझ्या खिशातलं सांगतोय यातला विषय नाही, तर खरोखर विचार करण्याजोगी गोष्ट आहे. हा मोर्चा धनगर समाजातील कोणत्याही नेत्यांच्या पुढाकाराने आयोजित केला नाही, मोर्चाचं नियोजन करताना मोर्चाचं आयोजन करताना बारामतीमध्ये  धनगर समाजातील कीती नेते उपस्थित होते?? आणि कोण कोण होते?? याचा जर विचार केला तर समजेल या मोर्चाची डाळ नक्की शिजतेय नेमकी कुठे...??"
पाठीमागे झालेल्या बारामती येथील आंदोलनाचा अभ्यास केल्यास तुमच्या लक्षात येईल की मा.महादेवजी जानकर साहेब हेच धनगर समाजाचं नेतृत्व करत होते. अभ्यासू आणि जिज्ञासु व्यक्तिमत्व तसेच त्यागी नेतृत्व असलेले मा.महादेवजी जानकर साहेब यांच्यामुळे धनगर समाज संपूर्ण ताकतीनिशी एकसंघ होऊन लढत होता.  जानकर साहेबांनी बारामतीतून पवार घराण्याला सुरंग लावत आपलं वर्चस्व निर्माण केलं आणि शरद पवारांना एक प्रकारचा धक्काच दिला आणि मग पवारांनी जानकर साहेबांचा धसकाच घेतला.
जर धनगर समाजाचं नेतृत्व करून जानकर साहेब पुढे आले तर राष्ट्रवादीला गबाळ गुंडाळावं लागेल या भितीपोटीच २३ मार्चचा मोर्चा शरद पवारांनी राष्ट्वादीमधील धनगर समाजातील चमच्यांना बारामतीला बोलावून आयोजित करण्याचं ठरवलं.
        स्व. बी के कोकरे साहेबांनी यशवंत सेनेची स्थापना करून धनगर समाजाला जागं केलं होतं. अखंड धनगर समाज बी के कोकरे साहेबाच्या नेतृत्वाखली एकत्र येत होता त्यामुळे बारामतीत शरद पवारांची गोची झाली होती आणि बी के कोकरे साहेबांचा खून करण्याचं पाप पवारांनी ओढावून घेतलं. तदनंतर यशवंत सेनेची धूरा मा. महादेवजी जानकर साहेबांनी सांभाळली आणि आज यशवंत सेना रासप मध्ये विलीन करुन जानकर साहेबांनी बारामतीमध्ये पुन्हा थैमान घातले आहे. जर जानकर साहेबांनी बारामती काबीज केली तर पवार घराण्याला रस्त्यावर यावं लागल हीच भिती शरद पवाराना वाटत आहे.
जानकर साहेबांचा बंदोबस्त कसा करायचा म्हणून पवारांनी जसं बी के कोकरे साहेबांच्या खूनानंतर धनगर समाज पेटून उठल म्हणून शिवाजीराव (बापू) शेंडगे यांनां जवळ केलं तसच जानकर साहेबांचं नेतृत्व पुढे येवू द्यायचं नाही म्हणून  प्रकाश शेंडगेंना जवळ करून धनगर समाजाला वरती येवू द्यायचं नाही हे कुटिल राजकारण शरद पवारांकडून केलं जातंय.
उद्याच्या मोर्चात सामील होणार्यांना माझा काही विरोध नाही पण जो मोर्चा धनगर समाजातील नेत्यांना विचारून आयोजित केला नाही तो धनगर समाजाचा मोर्चा कसं काय म्हणायचं??, अथवा धनगर समाजातील सर्व नेत्यांनी एकत्रित बसून जर मोर्चाचं आयोजन केलं असतं तर आम्ही बेधडकपणे मोर्चात सामील झालो असतो. जिथं धनगर समाजातील नेत्यांचा विचार केला जात नाही तिथं आमच्यासारख्या सर्वसामान्य लोकांची काय पर्वा करतील.
धनगर समाजातील बांधवांना पुन्हा एकदा सांगू इच्छितो की सत्ता असताना देखिल शरद पवारांनी धनगर समाजाला आरक्षणाचा हक्क मिळू दिला नाही ते पवार आज काय आम्हाला हक्क देणार आहेत ??? म्हणून त्यांची गुलामगीरी अन् चमचेगीरी सोडून द्या. ज्यादिवशी  धनगर समाजातील सर्व नेते एकत्रित बसून चर्चा करतील आणि आणि आंदोलनाची दिशा ठरवतील त्यादिवशी मी तर प्राणपणाने मोर्चात सहभागी होणार आहे अन् तुम्हीही व्हा.
जय मल्हार!! जय अहिल्या!!
            - नितीनराजे अनुसे
  अनुसेवाडी ता आटपाडी जि सांगली
            +917666994123
  nitsanuse.blogspot.com

धनगर समाजाला प्रबोधनाची गरज...

आज मी तुमच्यासमोर एक जीवंत उदाहरण देऊ इच्छितो, कदाचित यामधून आजच्या पिढीला नक्कीच काहीतरी शिकायला मिळेल.
आज मी रिझर्व बैंकेजवळून सी एस टी कडे निघालो असताना अचानक मी पाहिले की एका विजेच्या खांबाखाली जेमतेम १९-२० वर्षीय तरुणी वहीमध्ये काहीतरी लिहीत बसलेली होती. फोर्ट मार्केट मुंबईचा भाग असल्याने प्रथमता मला असे भासले की ती बिलाचा हिसाब करत बसली असावी. पण थोड्या जवळून पाहिले असता असे लक्षात आले की ती बिल/हिशोब वगैरे काही नाही तर UPSC चा अभ्यास करत होती.
मला आश्चर्य वाटले की जुन्या मुंबई सारख्या ठिकाणी त्याचप्रमाणे सतत वर्दळ असलेला फोर्ट मार्केट मुंबईचा हा भाग, येथे विज-पाणी मुबलक प्रमाणात उपलब्ध असताना देखिल अभ्यासासाठी फुटपाथ वरती का बसावे लागते?? मी मनाशीच विचार करू लागलो, का गरज पडली त्या मुलीला फुटपाथ वरती बसून विजेच्या खांबाखली अभ्यास करायची??
मी तिला विचारले असता तिने आत्मविश्वासाने सांगितले की "मला IAS व्हायचंय" तिचं हे उत्तर ऐकुण मी हैरान झालो अन् तिला "व्हेरीगुड मे गॉड ब्लेस यू " असे म्हणून गप्पच बसलो. कारण माझ्या गप्प बसण्याला एक कारण होतं ते म्हणजे त्या मुलीचे बैकग्रॉउंड...
त्या मुलीचं म्हणजेच प्रतिज्ञाचं कुटूंब फुटपाथ वरतीच कित्येक दिवसापासून  राहत आहे. तिचे वडिल सकाळी सकाळी दुसर्यांच्या गाड्या (कार) धुवायचे काम करतात तसेच दिवसभर वेगवेगळ्या हॉटेल मध्ये पाणी वाहायचं आणि शे दोनशे रूपये कमवायचे ही त्यांची रोजची दिनचर्या. तर ती मुलगी आई सोबत इतरांची धुणी-भांडी करून जेमतेम ७०-८० रुपये कमवते आणि रात्री मिळालेल्या वेळेत रस्त्यावर रहद्दारी असताना देखिल त्याकडे दुर्लक्ष करत अभ्यासावर लक्ष केंद्रित करून तिचे भविष्य गिरवत बसतेय. त्या भावी IAS अधिकारी प्रतिज्ञा ला एक सलाम करत तिला घवघवीत यश मिळवण्यासाठी शुभेच्छा देवून मी तिथून निघालो पण डोक्यात चाललेली विचाराची चक्रं मात्र काही केल्या थांबत नव्हती.
अरे आजच्या एकविसाव्या शतकात देखिल डॉ. बाबासाहेबांचे विचार मनात साठवून तोच संघर्ष तीच जिद्द चिकाटी आणि ध्येय डोळ्यासमोर ठेवणार्या कीतीतरी व्यक्तींची उदाहरणे देता येतील. मग यामध्ये माझा धनगर समाजच का मागे पडतोय.??? माझ्या समाजात "ऐसा माय का लाल कोई पैदा क्यूँ नही होता??. खोटी कारणं सांगूण टाळाटाळ करणारी लोकं समाजात खूप प्रमाणात पाहायला मिळताहेत. सकारात्मक विचार करण्याऐवजी नकारात्मक विचार करणारे बहाद्दर देखिल माझ्याच समाजात कसे काय जन्माला येतात?? (उदा: आंब्याच्या करंडीत एखादा आंबा जर सडलेला असेल तर आख्खी करंडी सडून जायला वेळ लागत नाही) तसंच माझ्या समाजाचं देखिल झालय. म्हणूनच समाजाला प्रबोधनाची गरज भासतेय.
आजच्या पिढीतील शाळकरी विद्यार्थ्याला जर विचारले तुला काय बनायचंय तर सरळ सरळ उत्तरं येतात ती पुढीलप्रमाणे -'माहीत नाही', 'अजून तसे काही ठरवले नाही', 'पुन्हा सांगतो', 'बघू नशिबात जे असेल ते..' अशी उत्तरं ऐकुण माझी जाम सटकते.
समाजातील शिक्षित तरुन-तरूनींनी समाजातील विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणं गरजेचं आहे तसेच भविष्याच्या दृष्टिकोणातून आजच त्यांना लढाईसाठी समर्थन केल्यास आजची पीढी कधीच वाट चुकणार नाही. माझ्या भरकटलेल्या धनगर समाजाला कोणी जागं करायचा प्रयत्नच कोणी केला नाही इतकंच नव्हे तर धनगर समाजाला अजून योग्य दीशा मिळालीच नाही म्हणूनच माझा समाज अजून अंधारात गुरफटला आहे. जोपर्यंत ध्येयप्रेरित होऊन एखादं ध्येय डोळ्यासमोर ठेवून वाटचाल करत नाही तोपर्यंत माझा समाज पुढे येणार नाही. ज्यादिवशी ध्येयवेड अंगीकृत करून समाजातील यूवकवर्ग योग्य दिशेने योग्य पाऊल टाकू लागला तर माझ्या धनगर समाजात IAS/IPS/ADVOCATES/DOCTORS/BUSINESSMAN यांची कमतरता भासणार नाही अन् त्यादिवशी भारताची प्रशासन यंत्रणा फक्त आणि फक्त धनगर समाजाच्याच हातात येईल.
जय मल्हार!! जय अहिल्या!!!
          -नितीनराजे अनुसे
अनुसेवाडी ता आटपाडी जि सांगली
       +917666994123
nitsanuse.blogspot.com

शिकलेल्या पोरास्नी म्हणावं....

शिकलेल्या पोरास्नी म्हणावं,
माघारी जरा फिरून बघ...
आडाणी असलेल्या मायबापाची,
विचारपूस तरी करून बघ...

खूप सोसल्या रे दुखाच्या झळया,
थोडसं जरा आठवून बघ...
सुकलेल्या त्या चेहर्यावरचं,
अश्रू डोळ्यांत साठवून बघ...

तळहाताच्या त्या फोडासारखा,
जपला रं तुला असा अलगद...
नाही कमी पडू दिलं रं गड्या,
पोटाची ती खळगी बडवत...

शिकला पाहिजे माझा पोरगा,
म्हणून चिंतातूर असे मायबाप...
काय म्हणून त्यांस विसरुन जावे,
उगाचि कशाला ओढावतोस पाप...

रक्ताचं ते नातं गड्या तुला,
नाही कळायचे सहजासहज...
ज्यावेळी होशील तु कोणाचा बाप,
त्यावेळी तुला येईल रं समज...
        - नितीनराजे अनुसे
  अनुसेवाडी ता.आटपाडी जि.सांगली
  - +917666994123
www.nitsanuse.blogspot.com

धनगर समाजाची अवस्था...

आज धनगर समाजाची अशी अवस्था झाली आहे की सांगायला सुद्धा किळस वाटतोय. तुम्ही माना अगर न माना पण जणू काय मंदिरातील घंटा 'कोणीही या अन् वाजवून जा' असंच झालय माझ्या समाजाचं. खरं सांगितलं तर बरं वाटत नाही अन् बरं सांगीतलं तर खरं वाटत नाही मग खरंबरं करत करत कुरबूर व्हायला सुरवात होते हे मात्र नक्की.
ज्या समाजाला स्वतःच्या इतिहासाचा विसर पडलाय ते काय इतिहास घडवणार? अहो सळसळत्या रक्ताच्या आम्ही औलादी, पोलादी छाताडाची ढाल करून मनगटाच्या जोरावर तलवारीने सपासप वार करून दुश्मनांना चारी मुंड्या चित करणार्या धनगर समाजाच्या जातीत जन्माला आलेल्या महापुरुषांचे आम्ही वारसदार, एकेकाळी राजा समाज असणारी आमची जमात आज गुलामगीरीत जगतेय.
आरं शोभतंय का तुम्हाला?? आरं तुमचा इतिहास उलघडून बघा एकेकाची काळीजं चार्रकन चिरुन जातील असा सुवर्णाक्षरात कोरून ठेवलेला इतिहास माझ्या समाजासमोर मांडायचा जास्तीत प्रयत्न करा.
माझ्या धनगर समाजाची आजची अवस्था बघून माझ्या तळपायाची आग मस्तकापर्यंत जाते नसानसातून रक्त सळसळू लागते, डोळ्यासमोर माझ्या महारुषांचा इतिहास उभा ठाकतो, हाताच्या मुठी आवळल्या जातात पण "काश मेरे पास अगर तलवार होती तो... ?" असे शब्द नकळतच तोंडातून बाहेर पडतात.
म्हणून मला आज तलवाररुपी शब्दांचा वापर करावा लागतोय, आज माझ्या हातात जी लेखनी आहे ती एक जणू काय तीक्ष्ण धार असलेली माझी तलवार आहे. माझ्या महापुरुषांनी तलवारीचा वापर केला होता तो  आमच्यावरती अन्याय करणार्या दुश्मनांची डोकी कापायला केला होता पण मी आज शब्दरुपी तलवारीचा वापर माझ्याच समाजाची डोकी गीरवायला करतोय. मला माझ्या समाजाची डोकी नांगरायची आहेत, शेतीची मशागत करायची असेल जमिनीचा पोत वाढवण्यासाठी जमिन कसदार करावी लागते म्हणूनच समाजामध्ये स्वाभिमान निर्माण करायचा असेल तर आज मला धनगर समाजातील समाजबांधवांची डोकी नांगरावी लागतील तरच सक्षम, सतर्क आणि सुसंस्कृत समाज मला तयार येईल ही माझी दूरदृष्टी असून माझ्या समाजाला राजेशाहीचा थाट मिळवून द्यायचाय. म्हणूनच मी त्या दिवसाची वाट पाहतोय की "दिल्लीच्या लाल किल्ल्यावर पिवळा फडकण्याची" त्याचदिवशी राजा सम्राट अशोकाचं राज्य आल्याचं सार्थक होईल नाहीतर गिधडांच्याच भितीनं आपल मरण वाचवत फिरायची वेळही दुर नसणार आहे. ज्या दिवशी दिल्लीच्या लाल किल्ल्यावर पिवळा फडकेल त्यादिवशीच पाणिपत मध्ये पराभूत झालेल्या मराठ्यांना अन् पाणिपतच्या मातीत रक्त सांडलेल्या शुरवीरांनाखरी श्रद्धांजलि मिळेल.  या युद्धात बिनबुडाचे आरोप माझ्या मल्हाररावांवरती झाले त्या आरोप करणार्या जातिवादी गिधडांना एकप्रकारची चपराक असेल. तो दिवस पाहण्यासाठी अन् माझ्या समाजावरती अन्याय करणार्यांच्या छाताडावरती थय्या थय्या नाचायचं माझं स्वप्न आहे त्यासाठीच मी लढतो आहे प्रसंगी मला रक्त सांडावं लागलं तरी बेहतर. मी कोणाच्या बांधीलकीत जगत नाही, आज मी ताठ मानेनं जगायला शिकलोय तुम्हीही ताठ मानेनं जगा नायतर तुमच्यावरती कोणीही थुंकायला अन् भुंकायलाही मागेपुढे पाहणार नाहीत.
उद्याच्या पीढीला जर कोणाच्या गुलामगीरीत जगू द्यायचं नसेल तर आज तुम्ही स्वाभिमानाने जगा एकत्र या अन् छाती ठोकून सांगा की मी धनगराची औलाद आहे. "वेळ आल्यास मरण पत्करेल पण कोणाला शरण जाणार नाही" हीच माझी नीती आहे.
 जर आज मला कोणी हाक दीली तर क्षणमात्रही विचार न करता मी त्याच्या मदतीला धावून जाईल कारण उद्या जर तीच वेळ माझ्यावरती आली तर मला कोणासमोर हात जोडायची गरज पडणार नाही त्यावेळी माझ्यावरती होणारे वार झेलायला माझेच शेकडो समाजबांधव ढालीसारखे उभे राहतील.
प्रत्येकाने जर हा विचार केला अन् तो आमलात आणला तर या देशावर फक्त आणि फक्त धनगर समाजच राज्य करेल ही दगडावरची रेषा आहे.
जय मल्हार!! जय अहिल्या!!!
  - नितीनराजे अनुसे
  - अनुसेवाडी ता.आटपाडी जि.सांगली
  - ७६६६९९४१२३
  - nitsanuse.blogspot.com

Saturday, 14 March 2015

एकत्र या परिवर्तन घडवायला..,

अरे समाज अजून कुठं जागा झालाय??
निघालाय इतिहास घडवायला....
आपल्याच महापुरुषांचा इतिहास विसरून,
लागलाय प्रस्थापितांची धोतरं बडवायला....

घरा-घरात अन् भावभावकीत भांडण लावून,
येताहेत प्रस्थापितच सोडवायला...
डोळ्यांवर अज्ञानाचं घोंगडं पांघरून म्हणतात,
हेच नेते आहेत आमचा विकास घडवायला...

लागेल  कोणाच्यातरी मनाला ठेस, मग
उठून उभा राहतील मलाच अडवायला...
कसला गर्व अन् कसला स्वाभिमान???
हे बसलैत एकमेकांचीच जिरवायला...

उद्याची पिढी तोंडात शेण घालेल,
जागा मिळणार नाही तोंड दडवायला...
म्हणूनच पिवळा झेंडा खांद्यावर घेवून,
एकत्र या परिवर्तन घडवायला
एकत्र या परिवर्तन घडवायला...
      -नितीनराजे अनुसे
     @ जागा हो धनगर
       +917666994123
www.nitsanuse.blogspot.com

Friday, 6 March 2015

झालय दुमत पाहिजे एकमत...

१८ मार्चच्या मोर्चाबद्दल दुमत झालय असं मला खुपजनांकडून ऐकायला मिळालं तर काहीजनांनी मला फोन करून विचारलं की नेमकं करायच काय???
【१】पहिलं मत असं की जर १८ मार्च रोजीचा जो मोर्चा आहे त्यात सहभागी झालो तर मी म्हणतोय असंच तो मोर्चा राष्ट्रवादी तर्फे आहे आणि  धनगर समाजाला माझ्याच समाजातील दलाल (तुम्हाला माहीतच आहे त्यामुळे मी त्यांची नावं घेत बसणार नाही) हे राष्ट्रवादीच्या दावणीला घेवून चाललेत.
【२】दुसरं मत असं की जर मोर्चामध्ये सहभागी नाही झालो तर तिथं धनगर समाजाची एकी दिसून येणार नाही.
मग नक्की काय करायचं ??? असाच प्रश्न समोर येतो, त्यावर मला विश्लेषण द्यायला आवडेल...
१)बांधवांनो पहिलं मत हे १००% बरोबर आहे कारण मोर्चाचं आयोजन हे प्रकाश आण्णा शेंडगेंनी केलंय. प्रकाश आण्णा शेंडगे सध्या राष्ट्रवादी मध्ये आहेत पण भाजप मध्ये आमदार असताना त्यांनी धनगर समाजाच्या आरक्षणाचा मुद्दा कीती वेळा विधानसभेत मांडला होता. यावर विचारविनीमय करावा. खरंतर त्यावेळी कोंग्रेस आणि राष्ट्रवादीचेच सरकार होते. मग त्यावेळी प्रकाश शेंडगेंनी धनगर समाजाबद्दल कधी आवाज उठवला होता का?? राष्ट्रवादी आणि कोंग्रेसने या गोष्ठीची कीती शहानीशा केली होती??? पण २०१४ च्या विधानसभेसाठी अन्यवेळी भाजप मधून प्रकाश शेंडगेंचे तिकीट कापलं गेल्याने त्यांनी धुर्त आणि लबाड असलेल्या राष्ट्रवादीमद्ये प्रवेश केला.
प्रकाश शेंडगेंना देखिल माहीत होतं की धनगर समाजाच्या आरक्षणासाठी कोंग्रेस आणि राष्ट्रवादीचा तीव्र विरोध आहे असे असताना देखिल प्रकाश शेंडगेंनी राष्ट्रवादीत का प्रवेश केला?? आण्णासाहेब डांगेदेखिल राष्ट्रवादीत आहेत, दत्ता मामा भरणे सुद्धा राष्ट्रवादीचेच..

२)मग दुसरं मत अशाप्रकारे आहे की जर मोर्चामध्ये सहभागी झालो नाही तर तिथं धनगर समाजात एकी दिसणार नाही.
समाजाची एकी असायला पाहिजे असं जर तुमचं मत असेल तर मग वेगवेगळ्या पक्षात स्वताची भाकरी भाजून घेणारे नेतेच एक होत नाहीत तर मग तुम्ही आम्ही सामान्य माणसं कशी काय एक होणार???
जर माझ्या धनगर समाजाचं नेतृत्व करायचं असेल तर सर्वांनी एकत्र येवून हा आरक्षणाबाबतचा मोर्चा यशस्वी करूयात. पण धनगर समाजातील नेते असे तसे एकत्र येणार नाहीत, कारण प्रत्येकजण स्वतःची कातडी वाचवायला बघतोय. काहीजन म्हणतात की ते स्वार्थासाठी करत नाहीत त्यांच्याकडे सात पिढ्या बसून खातील एवढी संपत्ति आहे. आणि ते आज फक्त आपल्या समाजासाठी लढताहेत.
माझं त्यांना सांगणं आहे की बाबांनो एवढी संपत्ति कमवायला तुम्ही कोणाच्या शेतात रोजगारानं गेला होता का??? जी तुम्ही संपत्ति कमवली आहे ती धनगर समाजाच्या नावाखाली कमवलीय समाजाची दलाली करून चमचेगीरी करून समाजाला बळीचा बकरा बनवून प्रस्थापितांच्या दावणीला बांधायचं पाप तुम्ही केलं त्यावेळीच तुम्ही सात पिढ्या बसून खातील एवढी संपत्ति कमवली. पण आजचा माझा धनगर समाज आयुष्यभर शेळ्या-मेंढ्या राखून, राब राब राबून सुद्धा त्यांचे कधी कधी खायचे वांदे होतात. मग तुम्ही एवढी संपत्ति कमवली कोठून??? समाज तिथंच राहिलाय फक्त नेते मोठे होत गेलेत.
तुम्ही जर स्वार्थासाठी समाजाचं नेतृत्व करत नसाल तर मग राजीनामं द्यायला काय होतंय???
तुम्हाला निस्वार्थीपणे लढायचं असेल तर मग प्रस्थापितांची चमचेगीरी दलाली सोडून तुम्ही पिवळ्या झेंड्याखाली का एकत्र येत नाही???
त्या त्या पक्षाचे राजीनामं का देत नाही???
असं काय दडलंय त्यात तुम्ही आपापल्या पक्षाला राजीनामं द्यायला तयार होत नाही???
वेगवेगळे झेंडे उरावर घेवून मिरवण्यापेक्षा महात्मा फुलेंनी दिलेला समतेचा पिवळा झेंडा घ्यायला तुम्हाला लाज वाटतेय का???
ज्यादिवशी तुम्ही सर्व नेते त्या त्या पक्षाचं राजीनामं देवून पिवळ्या झेंड्याखाली एकत्र याल त्यावेळीच तुम्ही  निस्वार्थीपणानं माझ्या समाजासाठी लढू शकता अन्यथा  माझ्या भोळ्या-भाबड्या धनगर समाजाची फसवणूक करू नका.
आज एक उठून म्हणतोय आरक्षण पाहीजे उद्या दुसरा म्हणतोय परवा तिसरा असंच जर आरक्षण मागत बसला तर तुमच्या पुढच्या पिढ्यानपिढ्या आरक्षणाचीच भिक मागत बसतील.
राजीनामं न देता जर तुम्ही १८ मार्चला विधानभवनार जाल त्यावेळी तुमच्यासोबत ठरावीकच लाचार लोक मोर्चात सामील होतील...
आणि जर सर्व धनगर समाज एकत्रित आणायचा असेल तर त्यासाठी तुम्ही नेत्यांनी आजच एकत्र या पण असं तसं नव्हे स्वार्थ बाजूला ठेवून समाजाच्या हितार्थ  त्या त्या पक्षाचे झेंडे पायदळी तुडवा आणि राजीनामे देवून पिवळ्या झेंड्याचे मानकरी बना अन्यथा भंडार्याची शपथ माझ्या भोळ्या-भाबड्या धनगर समाजाचं नेतृत्व करायच्या भानगडीत पडू नका.
आम्ही आमचं नेतृत्व स्वतः तयार करू....
जय मल्हार!! जय अहिल्या!!!
       -नितीनराजे
@ जागा हो धनगर
(+917666994123)
(Facebook.com/jagaho.dhangara)
(nitsanuse.blogspot.com)
यावरती आपल्या प्रतिक्रिया कळवा...

Thursday, 5 March 2015

<शुरवीर महाराजाधिराज राजे यशवंतराव होळकर मला बोलले...

पहाटे पहाटेची वेळ होती, गाढ साखर झोपेत असताना अचानक कोणीतरी गालावर जोरदार चपराक मारण्याचा भास झाला, कोण कोण असं म्हणत गालावर हात फिरवत डोळे चोळत उठून बसतो तोच समोर एक आकृति दिसली. धिप्पाडच्या धिप्पाड शरीरयष्टी, अंगावर जरदारी रेशमी वस्त्रे परिधान केलेली, भरदार दाडी आणि कोरीव मिशा, डोक्यावर शिलेदार हिरेजडित टोप धारण केलेल्या व्यक्तिच्या डोळ्यात एकदम तेज निखार होता, कमरेला म्याणात तलवार लटकत होती. मी त्या व्यक्तिला ओळखलं तोच तोंडातून शब्द फुटले की महाराज तुम्ही?? आणि इथं कसं काय???
ती व्यक्ति दुसरी तिसरी कोणी नव्हती तर इंग्रजांविरुद्ध १६ लढाया जिंकणारे आणि पुण्याच्या पेशव्यांना ताणून ताणून मारणारे मुत्सद्दी लढवय्ये महाराजाधिराज शुरवीर राजे यशवंतराव होळकर होते.
मी केलेल्या प्रश्नाचं मला खडसावतच महाराजांनी उत्तर दिलं, "तिकडं माझा धनगर समाज डोळ्यांवरती अज्ञानाचं घोंगडं पांघरुन गाढ झोपी गेलाय त्या माझ्या धनगर समाजाला कोण जागं करणार???"
महाराजांना काय उत्तर द्यायचं मलाच सुचत नव्हतं. माझे ओठ पुटपुटत होते तेवढ्यात महाराज पुन्हा गरजले "काय दातखीळी बसली की काय?? मी विचारलेल्या प्रश्नाचं मला उत्तर हवंय...
मी बोललो की महाराज धनगर समाज अजून गाढ निद्रावस्थेत झोपी गेलाय ही गोष्ठ खरी आहे.आणि त्यांना जागं करायचा मी पुरेपूर प्रयत्न सुद्धा करतोय. पण काहीजन जागे आहेत त्यांनी मात्र झोपेचं सोंग घेतलंय. महाराज एक म्हणसुद्धा आहे की
"एकवेळ झोपलेल्यांना जागं करता येतं पण झोपेचं सोंग घेणार्यांना जागं करता येत नाही."
तेवढ्यात महाराज ओरडले "अरे झोपेचं सोंग घेणार्यांना लाथा घालून उठवायचं असतं, एवढीपण अक्कल नाही का???. " वेड्याला जोड्याचा मार अन शहाण्याला शब्दांचा मार द्यायचा असतो."
मी पुन्हा बोललो "महाराज हा आपला पुर्वीचा धनगर समाज नाही राहिला की ज्याला स्वाभिमानाची किंमत होती. आज या महाराष्ट्रातला तमाम धनगर समाज प्रस्थापितांच्या दावणीला बांधला गेलाय. महाराज आजचा धनगर समाज स्वाभिमानाची भाषाच विसरून गेलाय. जो धनगर समाज बांधव स्वतःचा स्वाभिमान दुसर्यांच्या बुटाखाली गहाण टाकतोय त्याला मी कसं जागं करू??? ज्या धनगर समाजाला आपला इतिहासच माहीत नाही ते काय इतिहास घडविणार???

महाराज एकाएकी कडाडले अरे आम्ही घडवलेला इतिहास जर  तुम्हाला आठवत नसेल तर तुम्ही धनगरांचे वारसदार कशासाठी म्हणवून घेता?? हाडाची काडं करून ते बहाद्दर लढले होते अन रक्ताचं पाटच्या पाट पाण्यासारखं वाहत होतं एवढं बलिदान नेमकं कोणासाठी होतं?? छातीची ढाल करून मनगटाच्या जोरावर लढलेल्या महापुरुषांची अन पुर्वजांनी सांडलेल्या रक्ताचीच जाणीव जर धनगर समाजाला नसेल तर या गोष्ठीची आपल्या पुर्वजांना देखिल लाज वाटत असेल की आरे आपण कोणत्या जातीत जन्माला आलो?? आणि याचा देखिल त्यांना खेद वाटत असेल"
महाराजांचे डोळे लालबुंद झाले होते महाराज जाम चिडले होते.
धनगर समाजानं ३५० वर्षं या हिंदुस्थानावर केलेलं राज्य मग आद्यसम्राट चंद्रगुप्त मौर्या पासून राजा बिंदुसार, राजा सम्राट अशोका ते राजे मल्हारराव होळकर, रणरागीणी अहिल्यामाई होळकर, शुरवीर राजे यशवंतराव होळकर तुकोजीराव होळकर विरांगणा भिमाई होळकर यांचा सुवर्णाक्षरात कोरलेला धनगर समाजाचा इतिहास ते माझ्यासमोर मांडत होते. तलवारीच्या जोरावर मिळवलेल्या यशाच्या गाथा गिरवत होते. स्वातंत्र्यासाठी लढणारे आद्यप्रणेते राजे यशवंतराव होळकरच होते, हे आम्हापासून लपवून ठेवलं गेलं आणि चुकीचा इतिहास लिहला गेला कारण इतिहासकारच जन्माला आले होते.
इंग्रजांनी भारतावर आक्रमण केलं होतं. अनेक संस्थानांनी इंग्रजांशी हातमिळवणी केली होती, महाराज प्रत्येक संस्थानाच्या राजांना पत्र लिहून इंग्रजांविरूद्ध एकत्र लढण्याचे आवाहन करत होते. अख्खा हिंदुस्थान इंग्रजांपुढे झुकला गेला होता पण माझा राजा कोणापुढे न झुकता ताठ मानेनं कोरीव मिश्यांना ताव देत स्वाभिमानानं  जगत होता. सोळा लढायामध्ये इंग्रजांना पराभूत करत वायूवेगाने इंग्रजांच्या सैन्याना कापत सुटायचा, कधीकधी इंग्रज अधिकारी देखिल यशवंतराव होळकरांपुढे नतमस्तकी व्हायचे तर कधी काही इंग्रज अधिकारी रणांगणातून माघारी पळ काढायचे.
हीच ती धमक होती हाच त्यांचा शूरबाणा आणि मनगटाच्या जोरावर शत्रुंना चारीमुंड्या चीत करणारी त्यांची ती तलवार माझ्या मातीवर अत्याचार करणार्यांना कापत सुटायची.
महाराज बोलत होते मी मात्र सुन्न होऊन त्यांच्या शौर्यगाथा ऐकत होतो, एकाएकी अंगावर रोमांच उठायचे, अंग शहारून निघायचे माझ्याही मुठी आवळल्या जायच्या.
माझ्या ओठातून शब्द फुटले "महाराज मला आज्ञा द्या मी नेमकं काय करु??"
महाराज मला खडसावतच बोलले "आज प्रस्थापितांना जर धाक दावायचा असेल तर धनगर समाजाला जागं करावं लागेल, जे जागे आहेत त्यांना उठवून उभा कर,  त्यांना चालतं कर  बोलतं कर लेखणीरूपी धारदार  शब्दांच्या तलवारी प्रत्येकाच्या हातात दे की जे शब्द काळीजं चिरत जातील.
एखाद्या पिकाची मशागत करायची असेल तर अगोदर शेत नांगरावं लागतं तरच पिक जोमानं वाढतं त्याचप्रमाणे अगोदर धनगर समाजाचं डोकं नांगरलं तर भविष्यात धनगर समाजाला कोणाकडेही गहाण पडायची वेळ येणार नाही."
आज धनगर समाजातील काही दलाल धनगर समाजाला बळीचा बकरा बनवून प्रस्थापितांच्या दावणीला घेवून चाललेत. त्या दलालांना अन चमचेगिरी करणार्या नेत्यांना माझं सांगणं आहे की बाबांनो तुम्ही बुजुर्ग आहात तुम्हाला सर्व गोष्ठीचं ज्ञान आहे तुम्हाला जर माझ्या धनगर समाजाचं नेतृत्व करायचं असेल तर प्रस्थापितांचे बुट चाटायचे अन त्यांची गुलामगीरी चमचेगीरी करायचं सोडून द्या, त्या त्या पक्षाचा झेंडा पायदळी तुडवून त्यांचे राजीनामे द्या आणि तुम्हाला धनगर समाजावरती होणार्या अन्यायाचं भान असेल समाजाबद्दल तुम्हाला पुळका असेल तर एकत्र येवून लढा अन पिवळा झेंडा खांद्यावर घेवून चला मगच माझ्या भोळ्या-भाबड्या धनगर समाजाचं नेतृत्व करा अन्यथा आजची सुशिक्षीत युवा पीढी तुमच्यासारख्या दलालांच्या तोडात शेण घातल्याशिवाय शांत बसणार नाय.
महाराज मी शपथ घेतोय की, "आज धनगर समाजाला जागं करून प्रत्येकाची डोकी नांगरल्याशिवाय नितीनराजे शांत बसणार नाय. मग तिथं मला कोणीही आडवा तर त्याला तिथंच उभा चिरणार अन जर कोणी हात जोडून आला तर त्याला लोटांगण घालणार.
कारण जर आमच्या वाटेला कोणी आला तर त्याच्या वाटेवर जाऊन त्याची वाट लावल्याशिवाय आम्ही आमच्या वाटेवर परतनार नाय हा आमुचा इतिहास आहे."
जय मल्हार! जय अहिल्या!!
एक कट्टर धनगर
     -नितीनराजे
@ जागा हो धनगर
(+917666994123)
https://m2.facebook.com/jagaho.dhanagara आणि
(nitsanuse.blogspot.com)
यावरती आपल्या प्रतिक्रिया कळवाव्यात...

...धनगर आरक्षणाचं भीजत घोंगडं

आज काल राज्यभरातून मला कॉल्स येवू लागले. ठराविक कॉल काही कारणामुळे मी रिसीव्ह करु शकलो नाही. त्याबद्दल मी माफी मागतो पण ज्यांचे रिसीव्ह केले त्यातील भरपूर जनांनी माझ्याकडून लिहल्या गेलेल्या लेखांचे समर्थन केले आणि पुढील वाटचालीस शुभेच्छा सुद्दा दिल्या त्या सर्वांचा मी आभारी आहे, तर काहीजन कॉल करून लेख आवडल्याचे सांगत विनंती करु लागले की राजे हा १८ तारखेचा मोर्चा खूप महत्वाचा आहे.
मग माझी ट्यूबच पेटली की आरं जर १८ मार्च २०१५ चा मोर्चा खूप महत्वाचा वाटत असेल तर मग मागे पंढरपूर-बारामती आरक्षणासाठीची पदयात्रा काय मुर्ख म्हणून काढली होती का?? २१ जुलै पासून अमरण उपोषण करणारे समाजबांधव मुर्ख होते का?? जागो जागी चक्का जाम करुन प्रत्येक तहसिल कार्यालयावर मोर्चे काढले आंदोलने केली ती सर्व व्यर्थच का??? समाजकंटकावरती माझ्या वाघांनी शाई हल्ला केला पण त्यांच्यावरती अमाणूष अत्याचार केला गेला मग ते समाजासाठी लढणारे वाघ काय मुर्खच समजायचे का??? काहीजण आत्मदहनासाठी तयार झाले होते त्यांनाही मुर्खच समजायचं का?? मुंबई मध्ये देखिल १ अॉगस्ट रोजी चक्का जाम करत रेल्वे रोखो देखिल केला होता अनेक तरुणांना पोलीस कोठडी देखिल झाली मग तो आरक्षणासाठीचा संघर्ष काय मुर्ख म्हणून केला होता का?? एवढेच नव्हे तर या संघर्षामध्ये माझ्या धनगर समाजातील आई-बहिणी रस्त्यावर उतरल्या होत्या मग त्यापण मुर्खच होत्या का??? पाठीमागे विकास महात्मेंनी ४ जानेवारीला धनगर समाज मेळावा आयोजित केला होता मग धनगर समाजच मुर्ख म्हणायचा की धनगर समाजातील नेते???
मला समजावून सांगताय मोर्चा खूप महत्वाचा आहे मग तुम्ही मागच्या पंढरपूर-बारामती पदयात्रेत होता का??? जर मोर्चामध्ये सामील झाला असता तर आज बोलला नसता की १८ मार्चचा मोर्चा खूप महत्वाचा आहे म्हणून...
६० ते ७० समाजबांधव पंढरपूर मध्ये आरक्षण बाबतीत चर्चा करण्यासाठी एकत्र आले होते त्यातूनच बारामतीला पायी (पैदल) जाण्याचा निर्णय झाला मग लोकांनी हातात हात दिले, कोणालाच माहीत नव्हतं नेमकं आपल्याला करायचाय काय पण पंढरपूर वरतून निघालेली पदयात्रा बारामतीला पोहचेपर्यंत अनेक नेते आणि लाखो लोक एकत्र आले होते त्यावेळी जखमी झालेल्या वाघासारखा लाखोंचा पेटून उठलेला जनसागर शरद पवारांच्या बंगल्यासमोरून जात होता त्यावेळची अशी परिस्थीती  होती की पेटून उठलेले लोक काय करतील ते सांगता येत नव्हतं मग त्या पवारांच्या बंगल्याचं काय झालं असतं ??? तिथली सिक्योरिटी सुद्धा घामाघूम झाली होती याचा थोडा विचार करा पण ती परिस्थीती नियंत्रणात आणण्यासाठी एकच वाघ त्या बंगल्यासमोर उभा होता म्हणून पेटून उठलेले, जखमी वाघासारखे चिडलेले लाखो लोक त्या वाघाकडं बघून फक्त घोषणाबाजी करत स्टेडियमच्या दिशेने निघून गेले अन्यथा मा.महादेवजी जानकर साहेब जर तिथं नसते तर त्या लाखो लोकांनी शरद पवारांचा बंगला पेटवून टाकला असता जमिनदोस्त केला असता. याची माहीती तुम्हाला असायला हवी मग १८ मार्च च्या मोर्चा बद्दल धनगर समाजाच्या चमच्यांची कानभरणी करणारे शरद पवार आज कुठे असते त्याचा अंदाज तुम्हीच लावा मग मला सांगा कोणता मोर्चा महत्वाचा आहे ते.
मी पदरचं बोलतोय किंवा माझ्या खिशातलं लिहतोय अशातला विषय नाही पण वास्तविकता काय आहे त्यावरती चर्चा करुन विचारविनीमय करावा.
काही समाजबांधवांनी मला विचारलं की समाजात दुमत झाले आहे ते असे की मोर्चामध्ये सामील व्हावे की नाही ???
खरंतर संभ्रमावस्था निर्माण झाली आहे की नेमकं करायचं तरी काय?? जरी नेत्यांनी राजीनामं दिलं तर मग जायचं कोणासोबत??? असं कोणतं नेतृत्व आहे की जे धनगर समाजाला तारु शकतं???
तर मग बांधवांनो शरद पवारांना जाऊन विचारा की राष्ट्रीय समाज पक्ष हा नक्की कोणता पक्ष आहे तर शरद पवार देखिल सांगतील की हा धनगरांचा पक्ष आहे. दुसरा प्रश्न त्यांना  विचारा की महादेवजी जानकर कोण आहेत तर ते कोणताही अवधि न डवडता बोलतील की महादेव जानकर हा धनगरांचा नेता आहे. मग तुम्ही-आम्ही कोणत्या रक्ताच्या औलादी आहोत याची जाणीव तुम्हा-आम्हाला नाही का???
आजपर्यंत आपल्या धनगर समाजाला एक सक्षम नेतृत्व नव्हते म्हणून धनगर समाजाची पिछेहाट झाली. पण जिथं प्रस्थापितच बोलू लागलेत की महादेव जानकर धनगर समाजाचा नेता आहे. तो फिर हम-तुम कौनसी मीठ्ठी के बने है।
१८ मार्चचा मोर्चा तुम्हाला यासाठी महत्वाचा वाटत असेल की धनगर समाजाला ST चं आरक्षण मिळो अथवा न मिळो त्याचं सारं श्रेय शरद पवारांच्या पदरात पडावं यासाठीच ना????
माझा हेतू आरक्षणाला विरोध करणं नव्हे तर एकसंघ होऊनच आरक्षण हिसकावून घेवू एवढाच हेतू आहे. यामध्ये माझा वैयक्तिक स्वार्थ काहीही नाही फक्त माझ्या भोळ्या-भाबड्या अन अज्ञान समाजाला आपल्या हक्काचं ST चं आरक्षण मिळायला हवं हीच माझी तळमळ आहे.
१८ मार्च ला हजारो समाजबांधव जीवाचं रान करून मोर्चात सहभागी होतील पण लक्षात ठेवा जे सत्ता असताना आरक्षण देवू शकले नाहीत उलट धनगर समाजाला ST चं आरक्षण मिळू नये म्हणून पिछड, मोघे आणि पुरके यांना धनगर समाजाविरोधात उभं ठाकण्यास प्रवृत्त करणारं बांडगुळ तुम्हाला काय आरक्षण देणार???
जानकर साहेबांनी आरक्षणाचा मुद्दा उचलून धरला होता त्यामुळे जानकर साहेब हेच धनगर समाजाचे खरे नेते ठरले आणि आताही जर त्यांनीच हा मुद्दा लावून धरला तर महाराष्ट्राचं नेतृत्व धनगर समाजाकडं जाईल  आणि भविष्यात महादेव जानकर हाच एक बलाढ्य नेता तयार होईल मग मुठबर असलेल्या २००-३००  प्रस्थापित पवार पाटील देशमुख फडणवीस ठाकरेंना घरात बसावं लागल  या भीतीनंच शरद पवारांकडून १८ मार्च च्या मोर्चाची डाळ शिजवण्यात आली आहे आणि तुम्ही उतावळे बनून आरक्षणाची पोळी खायची या हेतूनं १८ तारखेला तोंड वर करून निघाला आहात पण तुम्हाला पोळी तर दूरची गोष्ठ आहे तिथं साधं शिजलेल्या डाळीचं कोळूनि सुद्धा तुम्हाला भेटणार नाही.
कारण,
धनगर समाजाला वर येवू द्यायचं नाही अन धनगरांना एकच नव्हे तर दोन दोन घोंगडी टाकून झोपवा असे सांगणार्या यशवंतराव चव्हाणांची राजकीय औलाद म्हणजे त्याचं नाव शरद पवार आहे मग प्रकाश शेंडगे, आण्णासाहेब डांगे, वडकुते, रुपनर, दत्ता मामा भरणे इ.ना मला विचारायचं आहे की तुम्ही बुजूर्ग आहात ज्ञानी आहात मग तुम्ही नक्की धनगर समाजासाठी काम करताय का धनगर समाजाच्या विरोधात????
जर धनगर समाजाचं काम करायचं असेल तर मग सक्षम, हुशार आणि जातिवंत धनगर असलेल्या नेत्यासोबत जाऊन आरक्षण हिसकावून घ्या नायतर मग तुमची अवस्था काय असेल हे मी सांगायची गरज पडणार नाही १८ तारखेला धनगर समाजच दाखवून देईन तुम्हाला....
आपलाच एक समाज बांधव
       - नितीनराजे
@ जागा हो धनगर
[+917666994123]
[Facebook.com/jagaho.dhangara]
[nitsanuse.blogspot.com]

Monday, 2 March 2015

आगोदर या प्रश्नांची उत्तरे द्या...

आरक्षणाचं नाव काढलं की मला भयंकार राग येतो. माझ्या तळपायाची आग मस्तकापर्यंत जाते.
अरे कोणासाठी आरक्षण पाहिजे?? कशासाठी पाहिजे?? याचे फायदे काय? सत्ताधारी लोकं आपल्याला आरक्षण का देत नाहीत?? आदीवाशी लोकं याला का विरोध करतात??
हे सर्वसामान्य धनगर बांधवांसाठी माझे प्रश्न आहेत. त्याव्यतिरीक्त धनगर समाजातील नेते आरक्षणासाठी आंदोलने मोर्चे का करताहेत?? जर त्यांना धनगर समाजाच्या आरक्षणासाठीच झटायचं आणि झगडायचं असेल तर ते एकत्रित का येत नाहीत?? प्रत्येकाच्या खाद्यावर वेगवेगळ्या पक्षाचा झेंडा कसा काय?? धनगर नावाची जमात एकच आहे की अनेक आहेत?? जर एकच धनगर समाज असेल तर मग नेते वेगवेगळे कसे काय?? धनगर समाजासाठी आणि आरक्षणासाठी लढायचं असेल तर समाजाचं विभाजन कशासाठी करताय??? या सर्वांची उत्तरं जर प्रत्येक समाजबांधवाला देता येतील त्यादिवशी आपण आरक्षणाचे मानकरी असणार हे मात्र निश्चित.
असे एक ना अनेक प्रश्न डोक्यात थैमान घालून बसलेत. पण हे प्रश्नच ज्याच्या डोक्यात येत नाहीत त्यांना उत्तरं तर कोठून सापडणार??? हा देखिल सर्वात मोठा प्रश्न म्हणावा लागेल.
अरे आपल्या आया-बहीणी उन्हातान्हात थंडी वारा पाऊस यांचा विचार न करता माळरानावर डोंगर-दर्यातून दगड-धोंडे काटे-कुटे तुडवत आयुष्याशी झगडत होत्या आणि आजही तीच परिस्थिति आहे. तरीपण या सर्व गोष्ठींचा न करता त्याच आपल्या आया-बहिणी भर पावसात आरक्षणासाठी रस्त्यावरवर उतरल्या होत्या.
का झालं असं?? का आपल्या आया-बहिणींना देखिल संघर्ष करावा लागतोय??
मग आपण भिक मागतोय की आपल्या हक्काचं आरक्षण मागतोय हेच मला समजेना.
धनगर समाज आरक्षण कृती समितीमधील सर्वच नेत्यांना माझी एक चपराक आहे की आपल्या माझ्याच आया-बहिणी रस्त्यावर उतरल्या होत्या याची जाणीव तुम्हाला असून देखिल आज तुम्ही थंड का?? सत्ता मिळाल्यावर १० दिवसात आरक्षण देतो म्हणनार्या फडवणवीस ला ११ व्या दिवशी तुम्ही जाब विचारायला का गेला नाही?? आरक्षणासाठी रस्त्यावर उतललेल्यांपैकी त्यात तुमच्या कोणी आई-बहिणी नव्हत्या का? आणि जर त्या तुमच्या आई-बहिणी असतील तर आज तुम्ही एवढे षंढ कसे काय झालात??
४ जानेवारी २०१५ रोजी नागपुर मध्ये धनगर समाजाचा मेळावा आयोजित केला होता मग फडण२० ने सांगितले होते की एका महिण्यात निर्णय घेणार मग त्या फडणवीस ला तिथंच का नाही की अगोदर झकमारायला १० दिवस सांगितले होते का?? जर एका महिण्यात निर्णय घेणार होता तर ४ फेब्रुवारी रोजी एक महिना झाला उद्या ४ मार्च ला २ महिने होतील. अजून कीती महिने मोजत बसायचं??
पाठीमागे उपाशी-तापाशी राहून मोर्चे आंदोलने केली, उपोषणे केली होती ते सर्व वासरलात का तुम्ही?? आपल्या आई-बहिणी रस्त्यावर उतरून आरक्षणाची भिक मागत होत्या हे पण विसरलात का तुम्ही?? कीती निष्ठूर झालात तुम्ही?? आर या पार म्हणून आरक्षणासाठी अख्ख्या महाराष्ट्रातील धनगर समाज एकत्रित आला होता मग मधूनच कसे काय विझलात???? काय दाखवून दिलं नेमकं तुम्ही?? हे प्रश्न मी तुम्हा सर्व धनगर समाजातील नेत्यांना अन बांधवांना देखिल विचारतोय यामध्ये धनगर समाजाच्या कोणत्याही नेत्याला टार्गेट केले नाही अन त्यांना समजावयला ते लहान तान्ही बाळं नव्हेत.
उद्या पुढे भविष्यात कधीही धनगर समाजाच्या आरक्षणासाठी कोणीही नेता नेतृत्व करेल पण त्या त्या नेत्यानं एकच गोष्ट लक्षात ठेवावी.
जर समाजाचं नेतृत्व करायचं असेल तर प्रस्थापित पवार पाटील ठाकरे फडणवीस याचे बुट चाटायचे सोडून द्या अर्थात त्यांची गुलामगीरी अन समाजाची दलाली चमचेगीरी बंद करुन तुम्ही कोणत्याही पक्षात काम करत असाल त्या त्या पक्षाला राजीनामा द्यावा. मग भाजप असो शिवसेना मनसे असो कोंग्रेस राष्ट्रवादी जनता दल, जन क्रांती असो अथवा शिवसंग्राम याव्यतिरीक्त छोट्या मोठ्या कोणत्याही संघटना असोत. त्या सर्व पक्षांना एक पत्रकार परिषद बोलावून तुम्ही राजीनामे द्या अन्यथा माझ्या धनगर समाजाचं नेतृत्व तुम्ही करू नका कारण तुम्ही त्या लायकीचे नसाल. आमच्या धनगर समाजातीलच तुम्ही औलादी असाल तर या ना एका पिवळ्या झेंड्याखाली मग महाराष्ट्च  काय दिल्ली हादरवून सोडतो.
आपलाच एक समाजबांधव
        नितीनराजे
@ जागा हो धनगर
 7666994123
जय मल्हार!! जय अहिल्या!!!

Thursday, 26 February 2015

.....तर राजीनामा द्या.

आदरणीय प्रकाश आण्णा शेंडगे,
मुंबई येथे १८ मार्च रोजी धनगर समाजाच्या वतीनं आरक्षणाच्या अंमलबजावणी साठी मोर्चाचे आयोजन केले आहे असं तुम्ही पत्रकार परिषदेत सांगितलं. ही बातमी वाचून तसा म्हणावं तसं उत्साहित नाही झालो. प्रकाश आण्णा चांगली गोष्ट आहे की समाजासाठी तुम्ही धडपडताय, तुम्हाला समाजाचा खूप पुळका येतोय, समाजाला आरक्षण मिळाल्याशिवाय त्याची अंमलबजावणी झाल्याशिवाय तुम्हाला जेवणातला एक घास देखिल गिळणार नाय.
प्रकाश आण्णा मी तुम्हाला विरोध करतोय अशातला विषय नाही किंवा मी तुमचा पाय ओढतोय यातलाही विषय नाही. आज तुम्ही माजी मंत्री शिवाजीराव शेंडगे म्हणजेच आदरणीय बांपूंचे वारसदार आहात पण सद्याची परिस्थिति अशी आहे की तुमच्याकडे अथवा रमेश(भाऊ) शेंडगे यांच्यापैकी आज कोणाकडेच आमदारकी देखिल नाही. खरंतर सांगायचा मुद्दा असा की ज्यावेळी तुमची आमदारकी गेली त्यावेळी तुम्हाला समाज आठवला का?? बापूंनी समाजासाठी कीती संघर्ष केला होता याचा तुम्हाला विसर कसा काय पडला होता??? ज्या बापूंच्या जीवावर बारामतीचा बोका अख्ख्या महाराष्ट्राला माहीत झाला. आदरणीय स्व बापूंनी ज्या माणसाचं बोट धरलं अन सांगितलं की हा तुमचा नेता आहे. पण त्या माणसानं धनगर समाजाचा फक्त वापरच करून घेतला याची जाणीव कशी काय नाही झाली??? ज्या माणसानं आजपर्यंत धनगर समाजाला फसवायचं काम केलं त्या माणसाकडून विधानसभेचं तिकीट मागताना तुम्हाला माझा धनगर समाज आठवला नव्हता का?? खरंतर तुम्ही आमदार असताना विधानसभेत कीतीवेळा धनगर समाजाच्या आरक्षणाबद्दल मुद्दा उपस्थित केला??? आज आमदारकी गेल्यानंतर धनगर समाजाचा तुम्हाला कसा काय पुळका आला?? आज तुम्ही आंदोलनाची दिशा ठरवताय यात तुमचा काही स्वार्थ तर नाही ना???
प्रकाश आण्णा जर तुम्हाला निस्वार्थीपणे धनगर समाजासाठी लढायचे असेल आणि खरंच तुम्हाला धनगर समाजाचा पुळका असेल तर तुम्ही
"आजच पत्रकार परिषद बोलावून राष्ट्रवादीला राजीनामा द्या". अन पिवळा झेंडा खांद्यावर घ्या.
आण्णा जर तुम्ही राष्ट्रवादीला राजीनामा दिला अन पिवळ्या झेंड्याच्या खाली एकत्र आला तर येत्या १८ मार्च ला १८ लाखांच्या वरती धनगर समाज मुंबई मध्ये एकत्रित आणायची जबाबदारी माझी हे माझे ओपन चैलेंज आहे.
आपलाच समाजबांधव
      नितीनराजे
@जागा हो धनगर

Tuesday, 24 February 2015

समाजाला झोपूद्या ना झोपलाय शांत...

झोपलाय हो माझा धनगर समाज शांत झोपूद्या. गाढ निद्रावस्थेत निपचित पडलाय उगाच डवचू नका. कशाला उगंच बोंबाबोंब करताय?? अहो ज्याला आपला इतिहासच माहीत नाही ते काय इतिहास घडविणार आहेत???
उगाच व्हाटसप वरतून वेळ वाया घालवण्यात काय अर्थ आहे??? जिथं स्वाभिमान गहाण टाकून प्रस्थापितांच्या दावणीला बांधल्या गेलेल्या आणि प्रस्थापितांचे बुट चाटायची सवय लागलेल्या समाजातील दलालांना कीती समजावून सांगणार??? त्या दलालांना स्वतःच्या स्वारथासाठी समाजाचे बाजारीकरण करायचं एवढंच माहीत आहे. त्यांना पैशाची तलप लागली आहे मग ते प्रस्थापितांकडुन लाखो रुपये घेवून येतात अन शे-दोनशे रूपये देवून सर्वसामान्य जनतेला आणि दिवसरात्र शेळ्या-मेंढ्या राखून पायाच्या नडग्या वाळवलेल्या गोरगरीब समाजाला भुलवायचं काम करताहेत.
आम्ही मात्र व्हाटसप वरती समाजाला एकत्रित करण्याच्या बढाया मारतोय.
पण दिवसेंदिवस समाजाला भुलवणारे दलाल मोठे होत चाललेत अन रानमाळावर दगड-धोंड्यातून काटे-कुटे तुडवणारा माझा माय-बाप अजून अज्ञानीच आहे. त्यांना खरं राजकारण माहीत नाही. मग व्हाटसप आणि फेसबुक वरतून आम्ही समाजात काय परिवर्तन करू शकतो.???
जिथं लोकांची मनं बदलली जात नाहीत तिथं आम्ही  काय बदल घडविणार??? आज धनगर समाजाला एकमेकांच्या विरोधात लढायला प्रवृत्त केले जाते तिथं माझ्या धनगर समाजाला कधीच वरती येवू द्यायचं नाही हा प्रस्थापितांचा उद्देश्य आमच्या ध्यानात कधी येणार??? अरे पण प्रस्थापितच नव्हे तर आज धनगर समाजातीलच वरीष्ठ नेते एकमेकांची जिरवण्यासाठी राजकारण करताहेत कीती लज्जास्पद बाब आहे ही.
मला त्यांची नावे घ्यायची नाहीत अन त्यांना कळालेही असेल.
आज धनगर समाजाच्या आरक्षणाचा मुद्दा जरी असला तर प्रत्येकाला वाटतंय आरक्षण मिळावं पण त्याचं श्रेय स्वतःच्या पारड्यात पडावं ही कटूनीती धनगर समाजातील नेत्यांची झाली आहे त्यामुळे प्रस्थापितांना दोष देण्यात अर्थ नाही. खायचे दात वेगळे आणि दाखवायचे दात वेगळे ही म्हण माझ्याच धनगर समाजातील नेत्यांना वापरावी लागेल. मग तिथं कोण लहान असेल अथवा मोठा.
धनगर समाजातील नेत्यांना वाटत असेल की धनगर समाजाला आरक्षण मिळायलाच पाहिजे तर ज्या पक्षात ज्या संघटणेत आज तुम्ही समाजाची चमचेगीरी करताय त्या त्या पक्षाचा तुम्ही राजीनामा द्या अन पिवळ्या झेंड्याखाली एकत्रित येवून मंत्रालय गाठा तुम्हाला आरक्षण कोण देत नाही तेच बघतो.
मग कोणी भाजपचा असेल शिवसेना, माकप, भाकप, शेकाप, राष्ट्रवादी असेल कोंग्रेस असेल स्वाभिमानी शेतकरी संघटना असो शिवसंग्राम असो जनसंग्राम असो अथवा जनता दल असो त्या त्या पक्षातील धनगर समाजातील नेत्यांना माझी विनंती आहे की जर तुम्ही धनगर असाल आणि जर तुमच्या नसात धनगरांचं रक्त सळसळत असेल तर प्रत्येकांनी राजीनामे देवून पिवळ्या झेंड्याखाली एकत्र या नाहीतर आरक्षणाच्या फालतू आणि पोकळ बडबड करत बसू नका.
जय मल्हार!! जय अहिल्या!!!
आपलाच समाजबांधव
      【नितीनराजे】
@【जागा हो धनगर】

Monday, 23 February 2015

ओळख माझ्या समाजाची...

धनगर समाज म्हटलं की शेळ्या-
मेंढ्या राखणार्या मेंढपाळाचं म्हणजेच धनगराचं चिञ
डोळ्यासमोर उभं राहतं.
एवढीच आमची ओळख आहे का??? याचा विचार
कधी धनगर समाज बांधवांनी केला आहे का??? जर
विचार केला असेल तर कशा प्रकारे केला ???
आणि नसेल तर का नाही केला??? हे प्रश्न
एकापाठोपाठ एक डोक्यात थैमान घालतात तेव्हाच
सर्व प्रश्नांची उत्तरेदखिल आपोआप येतात.
शेळ्या-मेंढ्यांची राखण करणं एवढीच धनगर
समाजाची ओळख नसून उत्तम प्रशासक आणि शूरवीर
अशी देखिल आमची ओळख आहे.
५००० वर्षापूर्वी अक्षरांचा शोध धनगरांनीच
लावला, इंडोनेशिया मध्ये लोहचुंबकाचा शोध देखिल
धनगरांनीच लावला. आद्य सम्राट राजा चंद्रगुप्त
मौर्या पासून, राजा बिंदुसार, राजा सम्राट अशोक,
राजे मल्हारराव होळकर, राजमाता अहिल्याबाई
होळकर, राजे यशवंतराव होळकर रणरागिणी भिमाई
होळकर यांचेपर्यंत ३५० वर्षं धनगर समाजाने या देशावर
राज्य केलं. एवढंच नव्हे तर "माउंट एवरेस्ट" सर
करणारी पहिलीच महिला धनगर समाजाची आहे.
अशी आहे आमची ओळख.
मुक्या जनावरांची तहान-भूख
जाणणारी अशी आमची जात आहे. मग तुम्ही तर
चांगली चालती-बोलती माणसं, तुम्ही फक्त हातात
हात द्या येणाऱ्या ५ वर्षांत कोणीही सुशिक्षित
बेरोजगार युवक शोधून सापडणार नाहीत
अशी व्यवस्था निर्माण करायला क्षणमात्र वेळ
लागणार नाही.
पारंपरिक व्यवसाय बाजूला ठेवून आज भरपूर प्रमाणात
युवा वर्ग मुंबई-पुणे
यांसारख्या ठिकाणी नोकरीसाठी बाहेर
पडला ही एक चांगलीच गोष्ट म्हणावी लागेल.
पण ज्या मुलांना शेळ्या-मेंढ्या राखत
असताना परिस्थीतीची जाणीव झाली ती मुलं आज
चांगल्या हुद्द्यावरती आहेत. पण बापाच्या पैशावर
एंजोय करणारी पोरं आज ५-१०
हजारांच्या तटपुंज्या नोकरीच्या शोधात फिरताहेत
ही एक खेदाची गोष्ट आहे. शालेय शिक्षणापासूनच
जर मुलांवरती लक्ष्य दिले नाही तर तीच मुले पुढे
भविष्यात हाताबाहेर जातात
याचीही प्रचीती तुम्हाला असेलच.
आई-वडील अडाणी(अशिक्षित) असल्याने
मुलाच्या अभ्यासाकडे लक्ष्य देत नाहीत पण
काही अपवाद असेही आहेत की अडाणी जरी असले
तरी ते मुलांकडून अभ्यास करवून घेतात आणि तीच मुलं
शेवटी यशाचे शिखर गाठतात.
(सदरच्या लेखातून मला समाजातील युवक
बांधवांना तसेच
पालकांना त्यांची जबाबदारी समजावून
सांगण्याचा छोटासा प्रयत्न केलेला आहे.)
या व्यतीरीक्त धनगर समाजातील बांधव उद्योजक
म्हणून कमी प्रमाणात ओळखले जातात. ५-१०
हजारांच्या तटपूंज्या नोकर्या शोधत
बसण्यापेक्षा स्पर्धात्मक परीक्षांना सामोरे
जायला हवे नाहीतर सकारात्मक दृष्टिकोणातून
कमीत कमी भांडवल गुंतवणूक करून छोटे-मोठे उद्योग
धंदे सुरू केले तर धनगर समाजात
उद्योजकांची कमी भासणार नाही. आजकाल जर
एखादा स्थायी बिज़नेस करायचा असेल तर
शासनाकडून मदत होते पण धनगर समाजातील युवक
नकारात्मक विचार करून रीस्क(धोका) घ्यायला पुढे
येत नाहीत. जोपर्यंत रीस्क नावाचा शब्द मनामध्ये
घर करून बसला आहे तोपर्यंत माझा धनगर बांधव पुढे
येणार नाही. धनगर समाजातील युवकांचे जर मनोबल
वाढवले नाही आणि जर
त्यांना एखाद्या गोष्टी बद्दल
प्रेरणा मिळाली नाही तर माझा धनगर समाज
तसाच अंधारात गुरफटून राहील.
 
   -●नितीनराजे●
@ जागा हो धनगर

Sunday, 22 February 2015

शेवटी हारलाय स्वाभिमान....

आज निंबवडे ता.आटपाडी जि. सांगली येथील पडळकर साहेबांच्या नेतृत्वाखाली लढलेल्या शेतकरी पैनल चा पराभव झाला. खरंतर निंबवडे ग्रामपंचायतीवर पडळकर साहेबांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रीय समाज पक्षाचे वर्चस्व आहे पण  पडळकर साहेब अन जानकर साहेब यांच्यातील गैरसमजूतीमुळे आणि त्यातून निर्माण झालेल्या वैमनस्यामुळे निंबवडे वि.का.स. सोसायटी गमवावी लागली.तिथं आज ना हरलेत जानकर साहेब नाही हरलेत पडळकर साहेब.
आज हरलाय निंबवडेतल्या प्रत्येक मनामनातला स्वाभिमान.
आरं जिथं स्वाभिमान गहाण टाकला जातो तिथं काय खाक विजयाची अपेक्षा करायची??? आज रासपची हार नाही झाली नाही भाजपची कारण आज इथं फक्त विकला गेलाय स्वाभिमान. आणि आज स्वाभिमान विकला गेल्याने पुन्हा एकदा मक्तेदारीचा विजय झालाय. जिथं मतं विकत घेवून विजयोत्सव साजरा केला जातो, तिथं स्वबळावर लढण्याची त्यांच्यात धमक नसते. आणि स्वबळावर निवडून यायला जिगर लागते अन वाघाचं काळीजही लागतं.
आज जो विजय झाला तो पैशाच्या मस्तीचा अन स्वाभिमान दुसर्यांच्या दारात विकणार्या सर्वसामान्य जनतेचा झाला.
हार पचवायला शिकायचं असतं हे आम्हाला पण माहित आहे, पण जिथं आम्ही स्वाभिमानानं आणि स्वबळावर लढतो तिथं आमची कोणीच हार करू शकत नाही आणि तिथं आम्ही ताठ मानेनं जगतो कोणाच्या गुलामगीरीत नव्हे हेही लक्षात असायला पाहिजे.
-@नितीनराजे

Saturday, 21 February 2015

गरज गैरसमज दूर करण्याची..

निंबवडे गावातील आणि परिसरातील सर्व मतदार बंधू-भगिनींना एक नम्रतेची विनंती.
बांधवांनो आजपर्यंतचं राजकारण कशापद्धतीचे झाले हे देखिल तुम्हा आम्हाला माहीत आहे. आज वि का स सोसायटीच्या निवडणूका तोंडावर येवून ठेपलेत पण आम्ही मात्र अजूनही एकमेकांच्यात भांडतोय. आजपर्यंत ग्रामपंचायत सोसायट्या पंचायत समिति जिल्हा परिषद ज्यांच्या ताब्यात होत्या त्यांनी आपल्या मतदार संघात कीती दिवे लावले याचा जरातरी गांभीर्याने विचार करावा. आज आपण भावा-भावाची डोकी फोडत बसतोय पण आपला हा नंगानाच प्रस्थापित बाबर-देशमुख-पाटलं बघत बसताहेत.
आपल्यातल्या आपल्यातच एकमेकांची डोकी फोडत बसलो तर प्रस्थापितांची घरं भरतील पण आपल्या सर्वसामान्य शेतकर्यांच्या वाट्याला नुसता दुष्काळ आणि कर्जबाजारीपणा आला आहे आणि इथून पुढेही तेच होत राहील.
दुष्टाळाच्या खाईत होरपळलेल्या माझ्या शेतकरी बांधवांना आज जर स्वाभिमानाने जगायचे असेल तर मा.गोपीचंद पडळकर साहेबांच्या शेतकरी विकास पैनल ला साथ द्यावी.
आपल्यातीलच एक शेतकर्याचा पोरगा
नितीनराजे

Thursday, 19 February 2015

परिवर्तन पाहिजे परावर्तन नको

आटपाडी तालुक्यातील सर्व धनगर समाज बांधवांना माझी कळकळीची विनंती आहे बाबांनो आज आपण २१ व्या शतकात आहोत. आजपर्यंत आपल्या पूर्वजांनी (वडिल, आजोबा अन  प्रस्थापितांचे झेंडे वागवले पण आपल्या पदरात नेमकं पडलं तरी काय???
आपले कीती आमदार आले?? कीती खासदार झाले?? हे प्रश्न विचारुन विचारुन वैताग आला आरं आतातरी शहाणं व्हा.
अगोदर तालुक्याचा विचार करा...
आजपर्यंत आटपाडी तालुक्यात देशमुख-पाटलांचे वर्चस्व होते आजपर्यंत वडिलधार्यांनी आजोबा पंजोबांनी त्यांचेच झेंडे वागवले. त्यावेळी आपल्या समाजात एखादा सक्षम नेता नव्हता पण तोही प्रश्न आज सुटलेला आहे.
आज आटपाडी तालुक्यात पडळकर साहेबांचे वर्चस्व आहे. पण जानकर साहेब आणि पडळकर साहेब यांच्यातील गैरसमजामुळे आटपाडी तालुक्यातील धनगर समाजाचे विभाजन होत चाल्लय.
नुसत्याच झालेल्या वि का स सोसायटी च्या निवडणुकीत पिंपरी, मिटकी अशा ठिकाणी पडळकर साहेबांच्या अख्ख्या पैनल चा विजय झालेला आहे.
पण जर जानकर साहेब आणि पडळकर साहेब यांच्यातील वैमनस्यामुळे राष्ट्रीय समाज पक्षाच्या कार्यकर्त्यांनी पडळकर साहेबांऐवजी माजलेल्या देशमुख-पाटलांशी हातमीळवणी करणं हे महामुर्खासारखं आहे.
कदाचित माझे विचार कडवे असतील माझे शब्द मनाला लागतील. पण आजपर्यंतचा इतिहास आठवून बघा की त्या आटपाडीच्या प्रस्थापित गिधडांनी धनगर समाजाचा नुसता वापर करुन घेतलाय.
आज आपण परिवर्तनाच्या दिशेने चाललो असताना देशमुख पाटलांशी हात मिळवणी करणं म्हणजेच आपण पुन्हा एकदा ५० वर्ष पाठीमागे चाल्लोय म्हणजेच परावर्तन होतय असं नाही का वाटत??
पण जानकर साहेबांनी हे पण सांगितले नाही की ज्यांनी तुमचं आजपर्यंत शोषण केलं त्याना साथ द्या असं साहेब कधी बोलले नाहीत अन बोलणारही नाहीत.
मग धनगर समाजाला सत्तेत हिस्सा मिळावा यासाठी सर्व समज गैरसमज बाजूला ठेवून पडळकर साहेबांचे पैनल निवडून आणण्याचा प्रामाणिक प्रयत्न करावा.
नाहीतर मागलं तसंच म्होरलं असंच होत राहील मग आपण शिकलो सवरलो नाही असाच त्याचा अर्थ होईल.
आटपाडी तालुक्यामध्ये आज इतर समाजसुद्दा पडळकर साहेबांच्या खाद्याला खांदा लावून काम करताहेत मग माझ्या धनगर समाजातील बांधवांनी थोडाफार विचार करावा की आजपर्यंत आम्ही डोळे झाकून देशमुख पाटलांची गुलामगीरी करत आलो त्याला आज खतपाणी घालण्याऐवजी मुळासकट उखडून टाकुया नाहीतर मग देशमुख पाटलांकडून दारू-मटणं घेवून त्याचीच बुट चाटायची वेळ तुमच्या -आमच्या भाऊ-भावकी, वडिलधारे अन समाजावरती येईल याची नोंद असावी.
     नितीनराजे
@ जागा हो धनगर

Wednesday, 18 February 2015

जय मल्हार योद्ध्यांनो,
मला काही जातीवाद करायचा नाही पण या भारत देशामध्ये जात-पात विरहित आणि धर्मनिरपेक्ष राज्यकारभार कुठे चालू आहे ते मला दाखवून द्या आणि जर धर्मनिरपेक्ष राज्यकारभार कुठे भारत देशामध्ये चालत असेल तर मी जातीवाद सोडून देतो.
आज ६७ वर्षे झाली देशाला स्वातंत्र्य मिळून माझ्या धनगर समाजाच्या वाट्याला काय आलं???
एकूण लोकसंख्येच्या टक्केवारीचा विचार करुन कीती आमदार विधानसभेत पाठवले ??? कीती खासदार संसदेत पाठवले??? फक्त एवढेच नाही तर नुसत्या महाराष्ट्रातील २८८ जागांसाठी धनगर समाजाच्या कीती उमेद्वारांना संधी दिली???
अरे दुसर्यांना काय नावे ठेवायची माझ्याच समाजातील लोकं एकमेकांचे पाय ओढताहेत मग कसा होईल विकास माझ्या समाजाचा??? आज इतिहास घडविण्याच्या गोष्टी केल्या जातात पण जोपर्यंत माझ्या बंधू-भगीनी जाग्या होत नाहीत तोपर्यंत नवीन इतिहास घडविण्याची फालतू बडबड व्यर्थच म्हणावी लागेल.
   आपलाच समाज बांधव
            नितीनराजे
जय मल्हार! जय अहिल्या!!

धनगर समाजाला एकत्र येणे हीच काळाची गरज

         
          खरंतर लहान तोंडी मोठा घास घेणं योग्य नाही असे म्हणतात पण आज मी हे वास्तवात उतरवायला चाललोय.....
लहानांपासून थोरापर्यंत आणि गरीबांपासून श्रीमंतापर्यंत सर्वजण पिवळ्या झेंड्याखाली यायला वेळ लागणार नाही. आज धनगर समाज जर जागा झाला तर फडणवीस पवार पाटील देशमुख ठाकरेंची पाचावर धारण बसेल. कोणत्याही क्षेत्रात मागचा पुढचा विचार करता कोणत्याही गोष्ठीचे भय न बाळगता नव्या उमेदीने आणि सर्व प्राणपणाणे झटणारा झगडणारा आणि मनात आलं तर सत्यात उतरवणारा फक्त धनगर समाजच आहे.
          एखादी गोष्ट मागून मिळत नसेल तर ती हिसकावून घ्यायची असं जानकर साहेब आम्हाला वेळोवेळी सांगताहेत.
भिक नको सत्तेची सत्ता पाहिजे आमच्या हक्काची. जानकर साहेब तुम्हीच आम्हाला शिकवलं ताठ मानेनं जगायला, तुम्हीच आम्हाला शिकवलं हिमतीनं जगायला. तुम्हीच आम्हाला जागं केलं, झोपेतून उठवलं, चालतं केलं बोलतं केलं त्याचाच परिणाम असा आहे की साहेब आज आम्ही कोणापुढे झुकत नाही. छाती ठोकून सांगतो की आम्ही धनगराच्या औलादी आहोत.
           पण साहेब आज भाजप सोबत तुम्ही युती केली चांगली गोष्ट आहे आपला एक आमदार पण आला आणि बाकीचे सर्व दुसर्या क्रमांकावर आहेत. साहेब तुम्हालाही माहीत आहे आणि आम्हाला ही माहीत आहे की भाजप सरकार आपल्याला आरक्षण नाही देणार.
             साहेब तुम्ही आज ब्राह्मणवादी भाजपची साथ सोडली तर पुढच्या विधानसभेला मुख्यमंत्री आपलाच होईल ही दगडावरची रेष आहे. एस टी गेल्यावर पाठीमागून हात करणारा पश्चिम महाराष्ट्र नाहीये तर दुष्काळाच्या खाइत भाजलेला आणि होरपळलेला पश्चिम महाराष्ट्र आहे. खिशालासुद्दा झळ बसत होती आजही तुमचे तेच कार्यकर्ते निस्वार्थीपणे काम करताना तुम्हाला दिसून येतील  त्यासाठी साहेब तुम्ही तयार केलेल्या हाडाच्या कार्यकर्त्यांना पुन्हा एक प्रेमाची हाक द्या अन तुमच्यासोबत घेवून चला.
            जानकर साहेब आज पश्चिम महाराष्ट्रातील जनता अजून तशीच दुष्काळाने होरपळली आहे. भाजप राष्ट्रवादीने धनगर समाजाचा फक्त वापर करून घेतला आहे. आज तुमच्या नेतृत्वामुळे भाजप सरकार सत्तेत आहे याची अख्ख्या महाराष्ट्राला जाणीव आहे. साहेब तुम्ही पश्चिम महाराष्ट्राच्या मातीत तयार केलेले तुमचे हाडाचे कार्यकर्ते अजूनही तुमच्याच सोबत आहेत एवढे की एखाद्या मुलीवर प्रेम जेवढे प्रेम करत नसतील तेवढे ते आजही तुमच्यासाठी जीव द्यायला तयार आहेत. पण साहेब आज गरज आहे त्यांना आपुलकीची आणि आपल्या माणसांची.
साहेब आज तुम्ही OBC बेसवर पक्ष बांधणी केली जनतेनंही तुम्हाला साथ दीली. धनगर समाजाने म्हणावी अशी साथ दीली नाही त्याबद्दल आजही तुम्ही दुखी आहात. पण साहेब जरा मागे वळून पाहा त्यावेळी तुम्हाला ओळखायला कदाचीत धनगर समाजाची चूक झाली असेल. पण आज धनगर समाजाला एकञीत येण्याची नितांत गरज आहे. साहेब तुमच्याच हाताखाली तयार झालेला एक कणखर उमदा धडाडीचा आणि सडेतोड बोलणारा तुमचाच एक हाडाचा नेता मा. गोपीचंद पडळकर साहेबांमुळे आज भाजपची पक्षबांधणी जोरात चालू आहे. सांगली जिल्ह्यात आज भाजप आहे ते तुमच्या कार्यकर्त्यामुळेच.
जानकर साहेब आणि पडळकर साहेब तुमच्यात जे काही गैरसमज झाले आहेत त्यात तुम्हा दोघांची चूक काही नाहीये. कार्यकर्त्यांनी सुद्धा खूप मोठी चूक केली मग एकाचे दोन आणि दोनाचे तीन असे करत  एकमेकांबद्दल अफवा उडत होत्या कोणालाच समजत नव्हते की नेमकं काय चाल्लय ते.... जानकर साहेब आणि पडळकर साहेब तुम्ही दोघांनी एकत्र येवून चर्चा करायचा देखील त्रास कोणी घेतला नाही. कारण कार्यकर्त्यांऐवजी तुमची कोणाचीतरी चूक असेलच पण त्यावरती विचारविनीमय झालाच नाही. चूक कोणाची ना कोणाची असू शकते पण त्याची दुसरी बाजू त्या चूकीचे समर्थन करण्यापेक्षा त्यावरती निष्कर्ष काढणे होय. तीच चूक मनात ठेवून एकमेकांचे राजीनामे मागत/देत बसाल तर  मागचं तसच म्होरचं होत राहणार आहे. आज बहुतांशी धनगर समाज पडळकर साहेबांसोबत आहे त्याचे कारण असे की सांगली जिल्ह्यातील मस्तवाल प्रस्थापीत नेत्यांना टक्कर देणारा नेता फक्त आणि फक्त पडळकर साहेबच आहेत. २०१४ च्या विधानसभेत पडळकर साहेबांना जी हार पत्करावी लागली ती जानकर साहेब आणि पडळकर साहेब वेगळे झाल्यामुळेच. मतदारांकडून भावना व्यक्त केल्या जात होत्या की जो जानकर साहेबांचा होऊ शकला नाही तो आमचा काय होणार???
        आज सांगली मध्ये रासप पुन्हा नव्याने पक्षबांधणी करतोय. जानकर साहेबांवरती प्रेम करणारे लोक पुन्हा एकञ येवू लागलेत पण त्याचवेळी पडळकर साहेबाना माननारा वर्ग पण मोठ्या प्रमाणात आहे आणि आज राज्यभर त्यांना माणनारा गट तयार झालाय. आज भाजप राज्यभर पक्षबांधणी साठी पडळकर साहेबांचा वापर करून घेत आहे पण विभाजन होतंय ते माझ्या धनगर समाजाचं होतंय हा बामणी कावा आमच्या कधी लक्षात येणार??"
        एकीकडे जानकर साहेबांमुळे रासप मध्ये धनगर समाज एकत्र येतोय तर दुसरीकडे भाजप मध्ये पडळकर साहेबांमुळे धनगर समाज एकवटतोय. एकीकडे जानकर साहेबांना कैबिनेट मंत्रीपदाची ऑफर दिली जातेय तर दुसरीकडे पडळकर साहेबांना चांगल्या पदाची ऑफर दिली जातेय. म्हणजे दोघांनाही झुलवत ठेवायचं आणि आरक्षणाचे गाजर दाखवून सत्तेचा मेवा खात बसायचं हे भाजपचे कटूकारस्थान/बामणी कावा माझ्या धनगर समाजाला कधी समजायचा? धनगर समाजात फूट पाडायचा डाव हा फडणवीस पवार पाटील देशमुख ठाकरेंचा आहे.
आज पडळकर साहेब सुद्धा आरक्षणाचा मुद्दा घेवून रणांगणात उतरलेत. आण्णासाहेब डांगे सुद्दा वेगळ्या मार्गाने आरक्षण मागताहेत. सोलापूर मधून मा.अर्जून सलगर तसेच नुसतेच भाजपमधून बाहेर पडलेले मा.प्रकाश आण्णा शेंडगे  पण वेगवेगळे आरक्षण मागत बसलो तर आपल्या पुढच्या कीतीतरी पीढ्या बरबाद होतील पण आपल्याला आरक्षण मिळणार नाही म्हणून मी समाजातील एक छोटासा घटक या नात्यानं विनंती करतो की आजपर्यंत जे काही झालं ते विसरून जावा. कोणाची चूक होती नव्हती ते पण विसरून जावा. मी मोठा होतोय की तू मोठा होतोय हा सुद्दा अहंभाव/अहंकार दोघांनीही मनातून काढून टाका. ज्यांची चूकून चूक झाली असेल अथवा गैरसमज झाले असतील तर ह्रदयांतकरणाने एकमेकांना माफ करा तुमच्या एकमेकांच्या स्वार्थासाठी नव्हे तर धनगर समाजाच्या हीतासाठी पिवळ्या झेंड्याखाली एकत्र या.
फक्त पश्चिम महाराष्ट्रातील धनगर समाजाचे विभाजन खालीलप्रमाणे होईल ते आपल्याला कळणार नाही पण झळ मात्र बसणार..।
१ मा आमदार महादेवजी जानकर साहेब
२ मा गोपीचंद पडळकर साहेब
३ मा आमदार गणपतराव(आबा) देशमुख
४ मा प्रकाश आण्णा शेंडगे राष्ट्रवादी
५ माजी मंत्री मा अण्णासाहेब डांगे
६ मा अर्जुन सलगर साहेब
७  मा आमदार दत्तात्रय भरणे मामा
८ मा बाळासाहेब(तात्या) गावडे
९  मा उत्तम जानकर
१० मा विश्वास नाना देवकाते
११ रमेश (भाऊ) शेंडगे
१२
१३
*
*
शेवटी धनगरी जत्रा आणि कारभारी सतरा असंच म्हणत बसायची वेळ येईल....
वेळीच एकत्र नाही आला तर येणारी पुढची पीढी तोंडात शेण घातल्याशिवाय गप्प बसणार नाही...
एकच नाद घुमूदे
धनगर सारा एक होऊ दे
आपल्यातीलच एक समाज बांधव
     ✍️नितीनराजे अनुसे
         जागा हो धनगर

Tuesday, 17 February 2015

दिव्य प्रकाशरुपी कंदील अर्थातच क्रांतीची मशाल : नितीनराजे अनुसे

ब्लॉग दि. १७ फेब्रुवारी २०१५

        चिकीत्सकपणे अभ्यास केल्यास असे दिसून येईलकी 21 व्या शतकात सुद्धा धनगर
समाजाची अवस्था अजूनही अत्यंत दयनीय
स्वरूपाची आहे.
विज्ञानामूळे माणसाच्या जिवनामध्ये अनेक बदल
घडत गेले, माणसाने समूद्राची खोली
गाठली, पृथ्वीच्या पोटातील विवीध
रसायनांचा शोध लावला,
आकाशावरती साम्राज्य
मिळवले आज माणूस चंद्रावर आणि मंगळावर
सुद्धा पोहचला पण माझा धनगर समाज अजूनही
अंधारतच गुरफटलेला आहे. अंधश्रद्धेवरती विश्वास
ठेवणार्या या माझ्या समाजाला
तेजस्वी प्रकाशाची गरज आहे.
'खरंतर झोपलेल्यांना जागे करता येते पण झोपेचं
सोंग(नाटक) करणार्यांना जागे
करता येत नाही' अशी एक म्हण आहे.
पण माझ्या मतानूसार 'सोंग
करणार्यांना सुद्धा लाथ घालून जागे करता येते'.
धनगर समाज अजूनही निद्रावस्थेत आहे.
अज्ञानाचं घोंगडे पांघरूण हा आजचा तरून
सुद्धा गाढ झोपी गेलेला आहे. मग
या समाजाला जर यशाच्या शिखरापर्यंत
पोहचायचं
असेल तर काही गोष्टींचा अवलंब केल्यास समाज
निश्चित स्थळी पोहचू शकतो हे माञ
नक्की....
त्यासाठी समाजातील तरून
पिढीला निद्रावस्थेतून जागे करा,
जे जागे आहेत/होतील त्यांना उठवून उभा करा,
समाजाच्या हक्कासाठी आणि समाजावरती
होणार्या अन्यायाच्या विरोधात लढण्यास
समर्थ करा, त्या तरूनांना बोलतं करा आणि
चालतंही करा करा,
पण पाऊल पुढे टाकण्याच्या अगोदर प्रत्येक
तरूनाच्या हातात एक ज्ञानरूपी कंदील
द्या जेणेकरून त्या तेजस्वी प्रकाशामध्ये
तो स्वतःचा मार्ग शोधून समाजाला
योग्य दिशा दाखवून देइल.
ज्ञानशक्तीच्या जोरावर पारंपारिक
आणि रूळलेल्या मार्गाचा अवलंब न करता नविन
मार्ग स्विकारेल
आणि स्वतःच्या पाऊलखूणा पाठीमागे राहतील
अशा प्रकारे
समाजामध्ये स्वतःची एक नविन ओळख निर्माण
करेल असच त्या तरूनांना प्रेरित करा.
या जिवणाच्या वाटेवर काही अडथळे येतील,
काही समस्या उद्भवतील पण धीर न खचता
यावरती मात करूनच पूढे जायला लागेल कधी-
कधी त्या वाटेवर चालताना तरूनांना
दगड-धोंडे आडवे येतील काटेकूटे आडवे येतील, ऊन
वारा पाऊस या सर्वांवर मात करून
पूढे जायला शिकवा.
'जर यशाच्या शिखरापर्यंत पोहचायच असेल तर
अपयशाच्या टेकड्या पार कराव्याच
लागतात'.
या प्रवासात जेव्हा डोंगर-टेकड्या आडव्या येतील
तेव्हा जे अशक्त आहेत जे डोंगर
चढू शकत नाहीत त्यांना स्वतःच्या पाठीवर
घ्या आणि डोंगर पार करा, जिथे
समूद्र-नद्या आडव्या येतील
तेव्हा ज्यांना पोहता येत नसेल त्यांनी
पोहणारांच्या पाठीवर बसा आणि समूद्र पार
करा.
अशा प्रकारे जर धनगर समाजाने एकमेकांची सुख-
दूःखे वाटून घेतली तर या जिवनाच्या
शर्यतीत फक्त आपण आणि आपणच
जगाच्या सर्वात पूढे राहू.....!
त्यावेळी आपल्या पूर्वजांना एक
प्रकारचा विलक्षण आनंद होईल आणि सर्वजन
बोलतील....
"शाब्बास रे माझ्या वाघांनो !!!
'धनगर' असल्याची तुम्ही खरी लाज राखली"
"काश्मिरपासून कन्याकुमारी पर्यंत
आणि
गुजरात पासून आसामपर्यंत
हिमालयाच्या पर्वत रांगेतून,
सह्याद्रीच्या दरी-खोर्यातून..
एकच नाद घूमूदे,
धनगर सारा एक होऊदे".
    ✍️नितीनराजे अनुसे
 अनुसेवाडी ता.आटपाडी जि.सांगली
   +918530004123

धनगर समाज काल आज आणि उद्या : नितीनराजे अनुसे

           परकीय शत्रुंच्या छाताडावर पाय ठेवून १८०० वर्षे या हिदुस्थानावर आपली दहशत निर्माण करत राज्यकारभार करणारा आणि राजेशाही थाटात मिरवणारा माझा धनगर समाज आज निद्रावस्थेत आहे/गाढ झोपी गेला आहे.
           एकेकाळी राजा समाज असणारी आमची औलाद आज गुलामगीरीत का वागतेय??? मनगटाच्या जोरावर तलवारीने वार करून अखंड भारत एका छत्रीखाली आणणाऱ्या राजा सम्राट अशोकाच्या इतिहासाचे आम्ही मानकरी, अटकेपार झेंडा गाढणाऱ्या राजे मल्हारराव होळकर यांच्या इतिहासाचे साक्षीदार आम्ही, २८ वर्षे दिल्लीच्या तख्तावर बसून हिदूस्थानाच्या विशाल भू-भागावर राज्य करणाऱ्या रणरागीनी राजमाता अहिल्याबाई होळकरांचे मावळे आम्ही, शुरवीर यशवंतराव होळकरांचे वारसदार आम्ही असे असताना तळपत्या तलवारीचा अन् आमच्या नसानसातून वाहणाऱ्या सळसळत्या रक्ताचा जणू काय आम्हाला विसरच पडलाय... धनगर समाजाचं नाव घेताच चळचळ कापणाऱ्या जाट रोहिल्यांना यमसदनी पाठवणारी आमची औलाद आज घोंगडी पांघरून गाढ झोपी कशी काय गेली? लाज वाटतेय माझी मला अरे मी कोणत्या समाजात जन्माला आलोय? ज्या समाजाला आमचाच आमच्या पूर्वजांनी रचलेला जर इतिहासच आठवत नसेल तर आम्ही काय खाक इतिहास घडवू शकतो?
आज देशाला स्वातंत्र्य मिळून ६७ वर्षे झाली पण आमच्याच हक्काच्या आरक्षणासाठी आम्हाला भिक मागावी लागतेय ही सर्वात मोठी लाजीरवाणी गोष्ठ म्हणावी लागेल. अरे जिथं घोंगड्याच्या इशाऱ्यावर वरूणराजा सुद्धा बरसतो मग आपल्या हक्काच्या  आरक्षणासाठी प्रस्थापीतांच्या पाया पडायची वेळ तुम्हा-आम्हावर का आली? आपल्यातच जर एकी असती तर आज त्या प्रस्थापीतांवर आमचे बूट चाटायची वेळ आली असती. पण मराठा आणि ब्राह्मण हे दोन्ही समाज असे आहेत की धनगर समाजाला कधीच वरती येवू देत नाहीत आणि आपणही आपल्यातच एकमेकांची डोकी फोडत बसलो तर आपली मर्कटलीला पाहत बसणारे मराठा-ब्राह्मण आपल्याला कधीच सत्तेवर येवू देणार नाहीत.
         म्हणून बांधवांनो आजतरी एकत्र या नाहीतरी उद्याची आपली भावी पीढीसुद्दा तुमच्या-आमच्या सारखीच गुलामगीरीत जगेल.
आपलाच एक समाजबांधव.
     ✍️नितीनराजे अनुसे
         जागा हो धनगर