आदरणीय प्रकाश आण्णा शेंडगे,
मुंबई येथे १८ मार्च रोजी धनगर समाजाच्या वतीनं आरक्षणाच्या अंमलबजावणी साठी मोर्चाचे आयोजन केले आहे असं तुम्ही पत्रकार परिषदेत सांगितलं. ही बातमी वाचून तसा म्हणावं तसं उत्साहित नाही झालो. प्रकाश आण्णा चांगली गोष्ट आहे की समाजासाठी तुम्ही धडपडताय, तुम्हाला समाजाचा खूप पुळका येतोय, समाजाला आरक्षण मिळाल्याशिवाय त्याची अंमलबजावणी झाल्याशिवाय तुम्हाला जेवणातला एक घास देखिल गिळणार नाय.
प्रकाश आण्णा मी तुम्हाला विरोध करतोय अशातला विषय नाही किंवा मी तुमचा पाय ओढतोय यातलाही विषय नाही. आज तुम्ही माजी मंत्री शिवाजीराव शेंडगे म्हणजेच आदरणीय बांपूंचे वारसदार आहात पण सद्याची परिस्थिति अशी आहे की तुमच्याकडे अथवा रमेश(भाऊ) शेंडगे यांच्यापैकी आज कोणाकडेच आमदारकी देखिल नाही. खरंतर सांगायचा मुद्दा असा की ज्यावेळी तुमची आमदारकी गेली त्यावेळी तुम्हाला समाज आठवला का?? बापूंनी समाजासाठी कीती संघर्ष केला होता याचा तुम्हाला विसर कसा काय पडला होता??? ज्या बापूंच्या जीवावर बारामतीचा बोका अख्ख्या महाराष्ट्राला माहीत झाला. आदरणीय स्व बापूंनी ज्या माणसाचं बोट धरलं अन सांगितलं की हा तुमचा नेता आहे. पण त्या माणसानं धनगर समाजाचा फक्त वापरच करून घेतला याची जाणीव कशी काय नाही झाली??? ज्या माणसानं आजपर्यंत धनगर समाजाला फसवायचं काम केलं त्या माणसाकडून विधानसभेचं तिकीट मागताना तुम्हाला माझा धनगर समाज आठवला नव्हता का?? खरंतर तुम्ही आमदार असताना विधानसभेत कीतीवेळा धनगर समाजाच्या आरक्षणाबद्दल मुद्दा उपस्थित केला??? आज आमदारकी गेल्यानंतर धनगर समाजाचा तुम्हाला कसा काय पुळका आला?? आज तुम्ही आंदोलनाची दिशा ठरवताय यात तुमचा काही स्वार्थ तर नाही ना???
प्रकाश आण्णा जर तुम्हाला निस्वार्थीपणे धनगर समाजासाठी लढायचे असेल आणि खरंच तुम्हाला धनगर समाजाचा पुळका असेल तर तुम्ही
"आजच पत्रकार परिषद बोलावून राष्ट्रवादीला राजीनामा द्या". अन पिवळा झेंडा खांद्यावर घ्या.
आण्णा जर तुम्ही राष्ट्रवादीला राजीनामा दिला अन पिवळ्या झेंड्याच्या खाली एकत्र आला तर येत्या १८ मार्च ला १८ लाखांच्या वरती धनगर समाज मुंबई मध्ये एकत्रित आणायची जबाबदारी माझी हे माझे ओपन चैलेंज आहे.
आपलाच समाजबांधव
नितीनराजे
@जागा हो धनगर
मुंबई येथे १८ मार्च रोजी धनगर समाजाच्या वतीनं आरक्षणाच्या अंमलबजावणी साठी मोर्चाचे आयोजन केले आहे असं तुम्ही पत्रकार परिषदेत सांगितलं. ही बातमी वाचून तसा म्हणावं तसं उत्साहित नाही झालो. प्रकाश आण्णा चांगली गोष्ट आहे की समाजासाठी तुम्ही धडपडताय, तुम्हाला समाजाचा खूप पुळका येतोय, समाजाला आरक्षण मिळाल्याशिवाय त्याची अंमलबजावणी झाल्याशिवाय तुम्हाला जेवणातला एक घास देखिल गिळणार नाय.
प्रकाश आण्णा मी तुम्हाला विरोध करतोय अशातला विषय नाही किंवा मी तुमचा पाय ओढतोय यातलाही विषय नाही. आज तुम्ही माजी मंत्री शिवाजीराव शेंडगे म्हणजेच आदरणीय बांपूंचे वारसदार आहात पण सद्याची परिस्थिति अशी आहे की तुमच्याकडे अथवा रमेश(भाऊ) शेंडगे यांच्यापैकी आज कोणाकडेच आमदारकी देखिल नाही. खरंतर सांगायचा मुद्दा असा की ज्यावेळी तुमची आमदारकी गेली त्यावेळी तुम्हाला समाज आठवला का?? बापूंनी समाजासाठी कीती संघर्ष केला होता याचा तुम्हाला विसर कसा काय पडला होता??? ज्या बापूंच्या जीवावर बारामतीचा बोका अख्ख्या महाराष्ट्राला माहीत झाला. आदरणीय स्व बापूंनी ज्या माणसाचं बोट धरलं अन सांगितलं की हा तुमचा नेता आहे. पण त्या माणसानं धनगर समाजाचा फक्त वापरच करून घेतला याची जाणीव कशी काय नाही झाली??? ज्या माणसानं आजपर्यंत धनगर समाजाला फसवायचं काम केलं त्या माणसाकडून विधानसभेचं तिकीट मागताना तुम्हाला माझा धनगर समाज आठवला नव्हता का?? खरंतर तुम्ही आमदार असताना विधानसभेत कीतीवेळा धनगर समाजाच्या आरक्षणाबद्दल मुद्दा उपस्थित केला??? आज आमदारकी गेल्यानंतर धनगर समाजाचा तुम्हाला कसा काय पुळका आला?? आज तुम्ही आंदोलनाची दिशा ठरवताय यात तुमचा काही स्वार्थ तर नाही ना???
प्रकाश आण्णा जर तुम्हाला निस्वार्थीपणे धनगर समाजासाठी लढायचे असेल आणि खरंच तुम्हाला धनगर समाजाचा पुळका असेल तर तुम्ही
"आजच पत्रकार परिषद बोलावून राष्ट्रवादीला राजीनामा द्या". अन पिवळा झेंडा खांद्यावर घ्या.
आण्णा जर तुम्ही राष्ट्रवादीला राजीनामा दिला अन पिवळ्या झेंड्याच्या खाली एकत्र आला तर येत्या १८ मार्च ला १८ लाखांच्या वरती धनगर समाज मुंबई मध्ये एकत्रित आणायची जबाबदारी माझी हे माझे ओपन चैलेंज आहे.
आपलाच समाजबांधव
नितीनराजे
@जागा हो धनगर

No comments:
Post a Comment