Wednesday, 18 February 2015

जय मल्हार योद्ध्यांनो,
मला काही जातीवाद करायचा नाही पण या भारत देशामध्ये जात-पात विरहित आणि धर्मनिरपेक्ष राज्यकारभार कुठे चालू आहे ते मला दाखवून द्या आणि जर धर्मनिरपेक्ष राज्यकारभार कुठे भारत देशामध्ये चालत असेल तर मी जातीवाद सोडून देतो.
आज ६७ वर्षे झाली देशाला स्वातंत्र्य मिळून माझ्या धनगर समाजाच्या वाट्याला काय आलं???
एकूण लोकसंख्येच्या टक्केवारीचा विचार करुन कीती आमदार विधानसभेत पाठवले ??? कीती खासदार संसदेत पाठवले??? फक्त एवढेच नाही तर नुसत्या महाराष्ट्रातील २८८ जागांसाठी धनगर समाजाच्या कीती उमेद्वारांना संधी दिली???
अरे दुसर्यांना काय नावे ठेवायची माझ्याच समाजातील लोकं एकमेकांचे पाय ओढताहेत मग कसा होईल विकास माझ्या समाजाचा??? आज इतिहास घडविण्याच्या गोष्टी केल्या जातात पण जोपर्यंत माझ्या बंधू-भगीनी जाग्या होत नाहीत तोपर्यंत नवीन इतिहास घडविण्याची फालतू बडबड व्यर्थच म्हणावी लागेल.
   आपलाच समाज बांधव
            नितीनराजे
जय मल्हार! जय अहिल्या!!

No comments:

Post a Comment