धनगर समाज म्हटलं की शेळ्या-
मेंढ्या राखणार्या मेंढपाळाचं म्हणजेच धनगराचं चिञ
डोळ्यासमोर उभं राहतं.
एवढीच आमची ओळख आहे का??? याचा विचार
कधी धनगर समाज बांधवांनी केला आहे का??? जर
विचार केला असेल तर कशा प्रकारे केला ???
आणि नसेल तर का नाही केला??? हे प्रश्न
एकापाठोपाठ एक डोक्यात थैमान घालतात तेव्हाच
सर्व प्रश्नांची उत्तरेदखिल आपोआप येतात.
शेळ्या-मेंढ्यांची राखण करणं एवढीच धनगर
समाजाची ओळख नसून उत्तम प्रशासक आणि शूरवीर
अशी देखिल आमची ओळख आहे.
५००० वर्षापूर्वी अक्षरांचा शोध धनगरांनीच
लावला, इंडोनेशिया मध्ये लोहचुंबकाचा शोध देखिल
धनगरांनीच लावला. आद्य सम्राट राजा चंद्रगुप्त
मौर्या पासून, राजा बिंदुसार, राजा सम्राट अशोक,
राजे मल्हारराव होळकर, राजमाता अहिल्याबाई
होळकर, राजे यशवंतराव होळकर रणरागिणी भिमाई
होळकर यांचेपर्यंत ३५० वर्षं धनगर समाजाने या देशावर
राज्य केलं. एवढंच नव्हे तर "माउंट एवरेस्ट" सर
करणारी पहिलीच महिला धनगर समाजाची आहे.
अशी आहे आमची ओळख.
मुक्या जनावरांची तहान-भूख
जाणणारी अशी आमची जात आहे. मग तुम्ही तर
चांगली चालती-बोलती माणसं, तुम्ही फक्त हातात
हात द्या येणाऱ्या ५ वर्षांत कोणीही सुशिक्षित
बेरोजगार युवक शोधून सापडणार नाहीत
अशी व्यवस्था निर्माण करायला क्षणमात्र वेळ
लागणार नाही.
पारंपरिक व्यवसाय बाजूला ठेवून आज भरपूर प्रमाणात
युवा वर्ग मुंबई-पुणे
यांसारख्या ठिकाणी नोकरीसाठी बाहेर
पडला ही एक चांगलीच गोष्ट म्हणावी लागेल.
पण ज्या मुलांना शेळ्या-मेंढ्या राखत
असताना परिस्थीतीची जाणीव झाली ती मुलं आज
चांगल्या हुद्द्यावरती आहेत. पण बापाच्या पैशावर
एंजोय करणारी पोरं आज ५-१०
हजारांच्या तटपुंज्या नोकरीच्या शोधात फिरताहेत
ही एक खेदाची गोष्ट आहे. शालेय शिक्षणापासूनच
जर मुलांवरती लक्ष्य दिले नाही तर तीच मुले पुढे
भविष्यात हाताबाहेर जातात
याचीही प्रचीती तुम्हाला असेलच.
आई-वडील अडाणी(अशिक्षित) असल्याने
मुलाच्या अभ्यासाकडे लक्ष्य देत नाहीत पण
काही अपवाद असेही आहेत की अडाणी जरी असले
तरी ते मुलांकडून अभ्यास करवून घेतात आणि तीच मुलं
शेवटी यशाचे शिखर गाठतात.
(सदरच्या लेखातून मला समाजातील युवक
बांधवांना तसेच
पालकांना त्यांची जबाबदारी समजावून
सांगण्याचा छोटासा प्रयत्न केलेला आहे.)
या व्यतीरीक्त धनगर समाजातील बांधव उद्योजक
म्हणून कमी प्रमाणात ओळखले जातात. ५-१०
हजारांच्या तटपूंज्या नोकर्या शोधत
बसण्यापेक्षा स्पर्धात्मक परीक्षांना सामोरे
जायला हवे नाहीतर सकारात्मक दृष्टिकोणातून
कमीत कमी भांडवल गुंतवणूक करून छोटे-मोठे उद्योग
धंदे सुरू केले तर धनगर समाजात
उद्योजकांची कमी भासणार नाही. आजकाल जर
एखादा स्थायी बिज़नेस करायचा असेल तर
शासनाकडून मदत होते पण धनगर समाजातील युवक
नकारात्मक विचार करून रीस्क(धोका) घ्यायला पुढे
येत नाहीत. जोपर्यंत रीस्क नावाचा शब्द मनामध्ये
घर करून बसला आहे तोपर्यंत माझा धनगर बांधव पुढे
येणार नाही. धनगर समाजातील युवकांचे जर मनोबल
वाढवले नाही आणि जर
त्यांना एखाद्या गोष्टी बद्दल
प्रेरणा मिळाली नाही तर माझा धनगर समाज
तसाच अंधारात गुरफटून राहील.
-●नितीनराजे●
@ जागा हो धनगर
मेंढ्या राखणार्या मेंढपाळाचं म्हणजेच धनगराचं चिञ
डोळ्यासमोर उभं राहतं.
एवढीच आमची ओळख आहे का??? याचा विचार
कधी धनगर समाज बांधवांनी केला आहे का??? जर
विचार केला असेल तर कशा प्रकारे केला ???
आणि नसेल तर का नाही केला??? हे प्रश्न
एकापाठोपाठ एक डोक्यात थैमान घालतात तेव्हाच
सर्व प्रश्नांची उत्तरेदखिल आपोआप येतात.
शेळ्या-मेंढ्यांची राखण करणं एवढीच धनगर
समाजाची ओळख नसून उत्तम प्रशासक आणि शूरवीर
अशी देखिल आमची ओळख आहे.
५००० वर्षापूर्वी अक्षरांचा शोध धनगरांनीच
लावला, इंडोनेशिया मध्ये लोहचुंबकाचा शोध देखिल
धनगरांनीच लावला. आद्य सम्राट राजा चंद्रगुप्त
मौर्या पासून, राजा बिंदुसार, राजा सम्राट अशोक,
राजे मल्हारराव होळकर, राजमाता अहिल्याबाई
होळकर, राजे यशवंतराव होळकर रणरागिणी भिमाई
होळकर यांचेपर्यंत ३५० वर्षं धनगर समाजाने या देशावर
राज्य केलं. एवढंच नव्हे तर "माउंट एवरेस्ट" सर
करणारी पहिलीच महिला धनगर समाजाची आहे.
अशी आहे आमची ओळख.
मुक्या जनावरांची तहान-भूख
जाणणारी अशी आमची जात आहे. मग तुम्ही तर
चांगली चालती-बोलती माणसं, तुम्ही फक्त हातात
हात द्या येणाऱ्या ५ वर्षांत कोणीही सुशिक्षित
बेरोजगार युवक शोधून सापडणार नाहीत
अशी व्यवस्था निर्माण करायला क्षणमात्र वेळ
लागणार नाही.
पारंपरिक व्यवसाय बाजूला ठेवून आज भरपूर प्रमाणात
युवा वर्ग मुंबई-पुणे
यांसारख्या ठिकाणी नोकरीसाठी बाहेर
पडला ही एक चांगलीच गोष्ट म्हणावी लागेल.
पण ज्या मुलांना शेळ्या-मेंढ्या राखत
असताना परिस्थीतीची जाणीव झाली ती मुलं आज
चांगल्या हुद्द्यावरती आहेत. पण बापाच्या पैशावर
एंजोय करणारी पोरं आज ५-१०
हजारांच्या तटपुंज्या नोकरीच्या शोधात फिरताहेत
ही एक खेदाची गोष्ट आहे. शालेय शिक्षणापासूनच
जर मुलांवरती लक्ष्य दिले नाही तर तीच मुले पुढे
भविष्यात हाताबाहेर जातात
याचीही प्रचीती तुम्हाला असेलच.
आई-वडील अडाणी(अशिक्षित) असल्याने
मुलाच्या अभ्यासाकडे लक्ष्य देत नाहीत पण
काही अपवाद असेही आहेत की अडाणी जरी असले
तरी ते मुलांकडून अभ्यास करवून घेतात आणि तीच मुलं
शेवटी यशाचे शिखर गाठतात.
(सदरच्या लेखातून मला समाजातील युवक
बांधवांना तसेच
पालकांना त्यांची जबाबदारी समजावून
सांगण्याचा छोटासा प्रयत्न केलेला आहे.)
या व्यतीरीक्त धनगर समाजातील बांधव उद्योजक
म्हणून कमी प्रमाणात ओळखले जातात. ५-१०
हजारांच्या तटपूंज्या नोकर्या शोधत
बसण्यापेक्षा स्पर्धात्मक परीक्षांना सामोरे
जायला हवे नाहीतर सकारात्मक दृष्टिकोणातून
कमीत कमी भांडवल गुंतवणूक करून छोटे-मोठे उद्योग
धंदे सुरू केले तर धनगर समाजात
उद्योजकांची कमी भासणार नाही. आजकाल जर
एखादा स्थायी बिज़नेस करायचा असेल तर
शासनाकडून मदत होते पण धनगर समाजातील युवक
नकारात्मक विचार करून रीस्क(धोका) घ्यायला पुढे
येत नाहीत. जोपर्यंत रीस्क नावाचा शब्द मनामध्ये
घर करून बसला आहे तोपर्यंत माझा धनगर बांधव पुढे
येणार नाही. धनगर समाजातील युवकांचे जर मनोबल
वाढवले नाही आणि जर
त्यांना एखाद्या गोष्टी बद्दल
प्रेरणा मिळाली नाही तर माझा धनगर समाज
तसाच अंधारात गुरफटून राहील.
-●नितीनराजे●
@ जागा हो धनगर
No comments:
Post a Comment