Saturday, 21 February 2015

गरज गैरसमज दूर करण्याची..

निंबवडे गावातील आणि परिसरातील सर्व मतदार बंधू-भगिनींना एक नम्रतेची विनंती.
बांधवांनो आजपर्यंतचं राजकारण कशापद्धतीचे झाले हे देखिल तुम्हा आम्हाला माहीत आहे. आज वि का स सोसायटीच्या निवडणूका तोंडावर येवून ठेपलेत पण आम्ही मात्र अजूनही एकमेकांच्यात भांडतोय. आजपर्यंत ग्रामपंचायत सोसायट्या पंचायत समिति जिल्हा परिषद ज्यांच्या ताब्यात होत्या त्यांनी आपल्या मतदार संघात कीती दिवे लावले याचा जरातरी गांभीर्याने विचार करावा. आज आपण भावा-भावाची डोकी फोडत बसतोय पण आपला हा नंगानाच प्रस्थापित बाबर-देशमुख-पाटलं बघत बसताहेत.
आपल्यातल्या आपल्यातच एकमेकांची डोकी फोडत बसलो तर प्रस्थापितांची घरं भरतील पण आपल्या सर्वसामान्य शेतकर्यांच्या वाट्याला नुसता दुष्काळ आणि कर्जबाजारीपणा आला आहे आणि इथून पुढेही तेच होत राहील.
दुष्टाळाच्या खाईत होरपळलेल्या माझ्या शेतकरी बांधवांना आज जर स्वाभिमानाने जगायचे असेल तर मा.गोपीचंद पडळकर साहेबांच्या शेतकरी विकास पैनल ला साथ द्यावी.
आपल्यातीलच एक शेतकर्याचा पोरगा
नितीनराजे

No comments:

Post a Comment