Wednesday, 25 March 2015

धनगर समाजाची अवस्था.,,

मला प्रसिद्धि पाहिजे किंवा मला समाजावरती माझा छाप पाडायचाय म्हणून मी लिहीत नाही. मला यामधून माझा स्वतःचा स्वार्थ साधायचा नाही. मला हे सर्व करायची गरज देखिल नाही मी कोणावरती अवलंबून नाही मला जे काय पाहिजे होतं ते सर्व माझ्याकडे आहे.
आज मी स्वाभिमानाने जगतोय कोणाच्या चहाच्या देखिल मिंद्यात पडत नाही.
मी समाजाला एकत्र करण्यासाठी मिळेल त्या वेळेत समाज प्रबोधन करतोय. कोणत्याही धनगर नेत्यांना शिव्या देवून मी स्वतःवरती रोष वाढवून घेत नाही. समाजानं आपलं नेतृत्व स्वतः केलं पाहिजे दुसर्यांच्या सांगण्यावरतून नव्हे.
मेंढ्यांचं नेतृत्व मेंढपाळानीच केलं तर मेंढ्यांचं रक्षण होईल पण तेच नेतृत्व जर लांडग्यांनी केलं तर मेंढ्यांचं भक्षण होईल. समाजाची सुद्धा अशीच अवस्था आहे जर धनगर समाजातील नेत्यांना धनगर समाजाचं नेतृत्व करायचं असेल तर त्यांनी लांडग्यांचं विचार मनातून काढले पाहिजेत. तिकडे लांडग्यांच्या गुहेत जावून प्रशिक्षण घ्यायचं, मेंढ्यांना कशी फूस लावून त्यांना लांडग्यांच्या दावणीला कसं ओढून आणता येईल याचा प्रयत्न प्रस्थापित नेते करत असतानाच धनगर समाजातील नेत्यांनी त्यांची पाठराखन करणं हा धनगर समाजबांधवांच्या पाठीत खंजीर खूपसण्यासारखाच प्रकार आहे.
धनगर समाजाचे खरे नेते कोण आणि धनगर समाजातील दलाल कोण याचा पर्दाफाश समाजबांधवांनी करून त्याची शहानिशा केलेली आहे. आजचा धनगर समाजातील यूवा वर्ग जागरूक झाल्यानं धनगर समाजासाठी झटणारा आणि झगडणारा नेता कोण हे सांगायची गरज पडणार नाही. समाजातील नेत्यांना जर दलाल म्हणवून घ्यायचं नसेल तर त्यांनी विचार करून त्या त्या पक्षातून राजीनामं देवून बाहेर पडा असंच आजपर्यंत सांगत आलोय लिहीत आलोय, पण त्या त्या  नेत्यांच्या समर्थकांकडून माझ्यावरती टीका केली जाते आहे की मी धनगर समाजातील नेत्यांना शिव्या देवून स्वतःची प्रसिद्धि करून घेतोय.
बांधवांनो धनगर समाजानं आणि धनगर समाजातील नेत्यांनी कुठंतरी एकत्रित यायला पाहिजे म्हणून माझ्यासारखेच कीतीतरी समाजबांधव यासाठी झटताहेत. डोळ्यांत तेल घालून लेखक/विचारवंत/अभ्यासक जीव तोडून तोडून समाजासाठीच लिहीताहेत पण त्याचा गैरसमज केला जातोय. समाजाच्या एकत्रिकरणासाठी कार्यरत असलेल्या समाज बांधवांवरती समाजविभाजन करतोय असे गंभीर आरोप केले जाताहेत. दुसर्यांचं झेंडे स्वतःच्या खांद्यावर वागवताना यांना लाज वाटत नाही पण स्वतःचं झेंडं खांद्यावर घ्यायला यांना लाज वाटतेय हे समाजासमोर मांडलं म्हणजे आम्ही त्यांना शिव्या देतोय असं समाजातील काही व्यक्तींना वाटतंय.
 धनगर समाजाला आरक्षण मागायच्या ऐवजी आमदारकी मागत असल्याचे आरोप कालच्या मोर्चातून झाले पण बांधवांनो जर आपलं हक्क मिळवायचं असतील तर नुसतंच बाहेरून लढून चालनार नाही तर विधानभवनात आणि संसदेत भांडता आलं पाहिजे. आजपर्यंत विधानभवनात आणि संसदेत धनगर समाजाच्या आरक्षणावरती बोलणारा आणि भांडणारा सक्षम हुशार अभ्यासक असा एकही सदस्य नव्हता म्हणूनच धनगर साजाचा ST आरक्षण अंमलबजावणीचा मुद्दा तसाच धूळ खात पडलाय...
पण विधानभवनात धनगर समाजाच्या हक्क्साठी भांडणार्या नेत्याला आडवण्यासाठी काही धूर्त लोकांनी धनगर समाजातील इतर नेत्यांचा खांद्यावर बंदूक ठेवण्यासाठी वापर करून घेतला आणि आजही करताहेत. मग त्या प्रस्थापित नेत्यांची धोतरं सांभळणार्यांना काय म्हणायचं ते समाज बांधवच ठरवतील....
जय मल्हार जय अहिल्या
        -नितीनराजे अनुसे
अनुसेवाडी ता आटपाडी जि सांगली
      +917666994123
nitsanuse.blogspot.com

1 comment:

  1. नितिनराजे साहेब तुमचे विचांराची तलवार मला आवडली
    आभिमान मला तुमचा मानाचा जय मल्हार
    योगेशभाऊ बच्छाव यशवंत सेना कार्यकर्ता तुमचे पोष्ट मला दिसली पाहीजे आस काही करा साह्ब घडवु मिळुन समाज..जय मल्हार

    ReplyDelete