Monday, 30 March 2015

बांधवांनो मला तुमच्याशी थोडसं बोलायचंय...
धनगर समाज संघटन करण्यासाठी तुम्ही आम्ही झटतोय हे किमान व्हाटसप वरतून तरी दिसून येतय  पण प्रत्यक्षात काय परिस्थिति आहे याबद्दल मला काही कल्पना नाही बुवा...
खूप वर्षापासून पाहत आलोय या महाराष्ट्र राज्यात धनगर समाजाच्या सतराशे साठ संघटना आहेत. कोणी आमुक संघटना तर एखादी तमुक संघटना.... बांधवांनो या सर्व संघटनांचं उद्धीष्ट काय आहे ते  माझ्या धनगर समाजाला कळू द्यात तरी...  संघटनेच्या अध्यक्षांनी काय म्हणून संघटना तयार करण्याचं ठरवलं??? मग संघटनेची उद्धीष्टे तर असतीलच ना???
धनगर समाजाला एकत्रित करण्याचं उद्धीष्ट तर प्रत्येक संघटनेचं आहे. त्याव्यतिरीक्त धनगर समाजाच्या न्याय व हक्कासाठी लढा देणं. धनगर समाजावरती अन्याय होत असेल तर त्यांच्या हाकेला धावून जाणं. धनगर समाजाची व्यथा विधानभवनात आणि संसदभवनेत मांडण्यासाठी धडपड करणं. सामाजिक, शैक्षणिक आणि व्यावसायिक क्षेत्रात धनगर समाजाला प्रेरित करणं तसेच मार्गदर्शन करणं ...इ.  सर्व संघटनांची याव्यतिरीक्त काही उद्धिष्टं असतीलच अथवा नसतीलही.
पण या संघटना गाव पातळी तालुका पातळी आणि जिल्हा पातळीवर धनगर समाजासाठीच कार्य करतात कोणी धनगर समाजाच्या विरोधात करत नाही. आपण सर्वजण एकाच रक्ताची माणसं आहोत, धनगर समाजातील थोर महापुरुषांच्या जातीत जन्माला आलेल्या आपण औलादी आहोत याची जाणीव तुम्हा-आम्हाला आहेच, मग सर्व संघटनांचं आणि संघटनांच्या पदाधिकार्यांचं कार्य एकच आहे पण मार्ग मात्र वेगळे आहेत. अशा कितीतरी संघटना या महाराष्ट्रात उदयास आल्या आणि गेल्याही. मग तुम्ही काय साध्य करू इच्छिता हे समाजासमोर मांडणं गरजेचं आहे असं मला वाटतं..
आजपर्यंत आपण प्रस्थापितांनाच शिव्या देत आलोय पण आतातरी जरा अक्कल येवू द्या. धनगर समाजाचं विभाजन कोणी प्रस्थापित नेते करत नाहीत तर धनगर समाजातीलच स्वतःला हुशार समजणारे समाजबांधव धनगर समाजाचं विभाजन करताहेत. संघटना चालकांनी आपल्या उद्धिष्टांमध्ये सरळ उल्लेख केला आहे की धनगर समाजाला एकत्र करणे. पण संघटना चालक स्वतः या मुद्द्यावरती ठाम आहेत का??? धनगर समाजानं एकत्र व्हावं असं म्हणत असतानाच तालुका आणि जिल्हा पातळीवरील धनगर समाजातील संघटना कधी एकत्र आलेत का??? त्या त्या संघटनेतील समाजबांधव धनगरच आहेत की दुसरे कोणी आहेत.?? जर धनगरच असतील तर मग त्यांच्या विचाराशी तुम्ही सहमत का होत नाही??? एका संघटनेतील नेते व पदाधिकारी दुसर्या संघटनेतील नेत्यांशी व पदाधिकार्यांशी कधी संपर्क साधतात का??
या सर्व प्रश्नांचं उत्तर नकारात्मक येईल कारण,
त्या त्या संघटनेचे चालक दुसर्या संघटनेतील नेत्यांशी खुन्नसपणे वागतात, एखाद्या नेत्याबद्दल बोलायला लागलं की त्या संघटनेचं चालक म्हणतात की मला त्या संबंधित नेत्याबद्दल चांगलही बोललेलं आवडणार नाही आणि वाईटही... जर तुम्ही धनगर समाजातील नेत्यांचा (प्रस्थापितांच्या दावणीला बांधलेल्या व्यतिरीक्त नेत्यांचा) आदर करत नसाल, सन्मान करत नसाल तर मग तुमच्या संघटनांचं पहिलंच उद्दिष्ट डळमळित झालं म्हणून समजा. तुम्ही जर राज्यपातळीवर एकत्रित पणे धनगर समाजाच्या हक्कासाठी चर्चा करू शकत नसाल लढू शकत नसाल तर मग त्या संघटनांमधूनच धनगर समाजाचं विभाजन होतंय आणि हीच गोम प्रस्थापितांच्या लक्षात आल्यामुळं धनगर समाजाच्या मतांचा फायदा त्या हरामखोर प्रस्थापितांना होतोय, याचा कधीतरी विचार करा.  मग धनगर समाजाच्या एकिकरणासाठी तुमची चाललेली उठाठेव व्यर्थच म्हणावी लागेल. धनगर समाजाला एकत्र आणायचे असेल तर त्या त्या संघटनेच्या पदाधिकार्यांनी स्वतः पेक्षा समाजाचा विचार करावा. जर तुम्हाला पदं महत्वाची वाटत असतील तर माझ्या भोळ्या भाबड्या धनगर समाजाचं नुकसान करू नका त्यांनातरी किमान एकत्रित येवून योग्य दिशा ठरवू द्या,
त्या त्या संघटनेतील नेत्यांनी एकमेकांचा आदर न करता वयाचं भान न ठेवता लहान असो अथवा मोठा, आरं तुरंची भाषा करून "मला त्याच्याबद्दल बोलल्यालं आवडत नाही मग चांगले असो अथवा वाईट" असं जर तुम्ही म्हणत बसला तर मग तुमची लायकी काय आहे ते आजच्या यूवा वर्गाला सांगायची गरज पडणार नाही. तुम्हाला जर एकमेकांत खुन्नस करत बसायचं असेल तर तसंच करत बसा पण लक्षात ठेवा तुमच्या पुढच्या शंभर पीढ्या सुद्धा सुधरणार नाहीत त्या पुढच्या पीढ्यापण खुन्नस करत बसतील आणि धनगर समाजाचं असंच विभाजन होत राहील. त्यासाठी  "आधीच मर्कट त्यात मद्य प्राशन केलं" अशी समाजाची दुरावस्था करू नका.
नाहीतर मग शेवटी सर्वजन म्हणताहेतच "धनगरी जत्रा अन् कारभारी सतरा"
जय मल्हार!! जय अहिल्या!!!
         नितीनराजे अनुसे
अनुसेवाडी ता आटपाडी जि सांगली
       +917666994123
nitsanuse.blogspot.com

No comments:

Post a Comment