Sunday, 22 March 2015

धनगर समाजाला प्रबोधनाची गरज...

आज मी तुमच्यासमोर एक जीवंत उदाहरण देऊ इच्छितो, कदाचित यामधून आजच्या पिढीला नक्कीच काहीतरी शिकायला मिळेल.
आज मी रिझर्व बैंकेजवळून सी एस टी कडे निघालो असताना अचानक मी पाहिले की एका विजेच्या खांबाखाली जेमतेम १९-२० वर्षीय तरुणी वहीमध्ये काहीतरी लिहीत बसलेली होती. फोर्ट मार्केट मुंबईचा भाग असल्याने प्रथमता मला असे भासले की ती बिलाचा हिसाब करत बसली असावी. पण थोड्या जवळून पाहिले असता असे लक्षात आले की ती बिल/हिशोब वगैरे काही नाही तर UPSC चा अभ्यास करत होती.
मला आश्चर्य वाटले की जुन्या मुंबई सारख्या ठिकाणी त्याचप्रमाणे सतत वर्दळ असलेला फोर्ट मार्केट मुंबईचा हा भाग, येथे विज-पाणी मुबलक प्रमाणात उपलब्ध असताना देखिल अभ्यासासाठी फुटपाथ वरती का बसावे लागते?? मी मनाशीच विचार करू लागलो, का गरज पडली त्या मुलीला फुटपाथ वरती बसून विजेच्या खांबाखली अभ्यास करायची??
मी तिला विचारले असता तिने आत्मविश्वासाने सांगितले की "मला IAS व्हायचंय" तिचं हे उत्तर ऐकुण मी हैरान झालो अन् तिला "व्हेरीगुड मे गॉड ब्लेस यू " असे म्हणून गप्पच बसलो. कारण माझ्या गप्प बसण्याला एक कारण होतं ते म्हणजे त्या मुलीचे बैकग्रॉउंड...
त्या मुलीचं म्हणजेच प्रतिज्ञाचं कुटूंब फुटपाथ वरतीच कित्येक दिवसापासून  राहत आहे. तिचे वडिल सकाळी सकाळी दुसर्यांच्या गाड्या (कार) धुवायचे काम करतात तसेच दिवसभर वेगवेगळ्या हॉटेल मध्ये पाणी वाहायचं आणि शे दोनशे रूपये कमवायचे ही त्यांची रोजची दिनचर्या. तर ती मुलगी आई सोबत इतरांची धुणी-भांडी करून जेमतेम ७०-८० रुपये कमवते आणि रात्री मिळालेल्या वेळेत रस्त्यावर रहद्दारी असताना देखिल त्याकडे दुर्लक्ष करत अभ्यासावर लक्ष केंद्रित करून तिचे भविष्य गिरवत बसतेय. त्या भावी IAS अधिकारी प्रतिज्ञा ला एक सलाम करत तिला घवघवीत यश मिळवण्यासाठी शुभेच्छा देवून मी तिथून निघालो पण डोक्यात चाललेली विचाराची चक्रं मात्र काही केल्या थांबत नव्हती.
अरे आजच्या एकविसाव्या शतकात देखिल डॉ. बाबासाहेबांचे विचार मनात साठवून तोच संघर्ष तीच जिद्द चिकाटी आणि ध्येय डोळ्यासमोर ठेवणार्या कीतीतरी व्यक्तींची उदाहरणे देता येतील. मग यामध्ये माझा धनगर समाजच का मागे पडतोय.??? माझ्या समाजात "ऐसा माय का लाल कोई पैदा क्यूँ नही होता??. खोटी कारणं सांगूण टाळाटाळ करणारी लोकं समाजात खूप प्रमाणात पाहायला मिळताहेत. सकारात्मक विचार करण्याऐवजी नकारात्मक विचार करणारे बहाद्दर देखिल माझ्याच समाजात कसे काय जन्माला येतात?? (उदा: आंब्याच्या करंडीत एखादा आंबा जर सडलेला असेल तर आख्खी करंडी सडून जायला वेळ लागत नाही) तसंच माझ्या समाजाचं देखिल झालय. म्हणूनच समाजाला प्रबोधनाची गरज भासतेय.
आजच्या पिढीतील शाळकरी विद्यार्थ्याला जर विचारले तुला काय बनायचंय तर सरळ सरळ उत्तरं येतात ती पुढीलप्रमाणे -'माहीत नाही', 'अजून तसे काही ठरवले नाही', 'पुन्हा सांगतो', 'बघू नशिबात जे असेल ते..' अशी उत्तरं ऐकुण माझी जाम सटकते.
समाजातील शिक्षित तरुन-तरूनींनी समाजातील विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणं गरजेचं आहे तसेच भविष्याच्या दृष्टिकोणातून आजच त्यांना लढाईसाठी समर्थन केल्यास आजची पीढी कधीच वाट चुकणार नाही. माझ्या भरकटलेल्या धनगर समाजाला कोणी जागं करायचा प्रयत्नच कोणी केला नाही इतकंच नव्हे तर धनगर समाजाला अजून योग्य दीशा मिळालीच नाही म्हणूनच माझा समाज अजून अंधारात गुरफटला आहे. जोपर्यंत ध्येयप्रेरित होऊन एखादं ध्येय डोळ्यासमोर ठेवून वाटचाल करत नाही तोपर्यंत माझा समाज पुढे येणार नाही. ज्यादिवशी ध्येयवेड अंगीकृत करून समाजातील यूवकवर्ग योग्य दिशेने योग्य पाऊल टाकू लागला तर माझ्या धनगर समाजात IAS/IPS/ADVOCATES/DOCTORS/BUSINESSMAN यांची कमतरता भासणार नाही अन् त्यादिवशी भारताची प्रशासन यंत्रणा फक्त आणि फक्त धनगर समाजाच्याच हातात येईल.
जय मल्हार!! जय अहिल्या!!!
          -नितीनराजे अनुसे
अनुसेवाडी ता आटपाडी जि सांगली
       +917666994123
nitsanuse.blogspot.com

No comments:

Post a Comment